उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्याचं निधन झालं आहे. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्या सासरवाडीमध्ये देखील अशीच स्थिती पहायला मिळत आहे. गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत, त्यांना मोठा धक्का बसला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर अजित पवार यांची सासरवाडी असलेलं तेर गाव ग्रामस्थांनी पूर्णपणे बंद केलं आहे. जे बोलणार तेच करणार असे आमचे नेते अजितदादा होते, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेर गावातील ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.