टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात वर्ल्ड कपआधी धमाका केलाय. सूर्यासेनेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत 20 ओव्हरमध्ये 270 पार मजल मारली आहे. इशान किशन याचा शतकी तडाखा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याचं वादळी अर्धशतक या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांचा डोंगर उभा केलाय. तसेच अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने 42 धावा करत फिनिशिंग टच दिला. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना किती धावांनी जिंकते? यासाठी थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.