राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट
नाशिक, अकोला, जालना जिल्ह्यांत नुकसान
द्राक्ष आणि आंबा बागांना मोठा फटका
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज
Mahrashtra Today Rain Update News राज्यात उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाने जोर धरला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीटीने तडाखा दिला. तसेच उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गुढी पाडव्याच्या सणावर पावसाचं सावटएकीकडे आज सर्वत्र गुढी पाडव्याच्या सणाचा आनंद सुरु असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून कडक ऊन आणि दुपारनंतर आकाश भरून येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडेमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे द्राक्षाच्या बागांना,व द्राक्षांना फटका बसला आहे,तर देवगाव मानोरी सह अन्य गावात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना अकोल्याला अवकाळी पावसाने झोडपलंअकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा फळ बागांना जोरदार फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सावरा, मोहाळा, वडनेर गंगईसह १५ ते २० गावात गारिपीटसह पाऊस झाला. जवळपास २० ते २५ मिनिटं गारपिट आणि पाऊस सुरू होता. या गारपीटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.
Shocking : घृणास्पद! चॉकलेटचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं, ४ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या जालना जिल्ह्यात अवकाळी गारांचा पाऊसआज हवामान खात्याने जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज दुपार पासून जालना शहरात काही भागात अवकाळी गारांचा पाऊस पडला आहे. अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादकासह फळबागातदारांची चिंता वाढली आहे.दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी विशेषतः फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोरशिम जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारनंतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, रिसोड तालुक्यातील मोप परिसरात तूरळक गारपीट झाली.असून,या बदलत्या हवामानामुळे काढणीला आलेली हळद,बिजवही कांदा तसेच आंबा फळबागांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.