
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यापुरतेच हे युद्ध मर्यादित राहिले नाही तर या युद्धाचा थेट मोठा फटका सर्वांनाच बसताना दिसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आजच्या घडीला उभी आहे. होर्मुजमधून एकही जहाज जाणार नाही, याकरिता मोठा पहारा इराणकडून दिला जात आहे. संपूर्ण होर्मुज खाडी बंद असून मोठा जाम लागला आहे. एखादं दुसरं जहाज तिथून जात आहे. इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज पुढे जाऊच शकत नाही. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणकडून अन्न पुरवठ्यात तुटवडा पडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. युद्ध जास्त काळ चालले तर इराणमधील अन्नाची मोठी कमी निर्माण होऊ शकते.
मरीन टॅकिंग डेटानुसार, होर्मुज खाडीतून 15 आणि 16 मार्च दरम्यान फक्त सहा ते सात जहाज गेले असतील. यापेक्षा जवळपास सर्वांनी इराणच्या इमाम खुमेनी बंदरगाहवर माल उतरवला. येथे माल उतरवल्यानंतर हे जहार पुन्हा होर्मुज खाडीतून परतले. या जहाजांपैकी एक गियाकोमेटी होते, ज्यात कॅनडाचे सोयाबीन आणले गेले.
अन्न इतर देशातून बऱ्यापैकी इराण आयात करतो. रिपोर्टनुसार, इराण दरवर्षी 1.5 मिलियन टन मक्का उत्पादन करतो. त्यापैकी 8 मिलियन टनपर्यंत आयात करतो. शेती ही या देशासाठी मोठी समस्या आहे. तिथे पाणीची कमी असल्याने पिक म्हणावे तसे चांगले येत नाही, ही तेथील शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. युद्धादरम्यान इराणकडून 4 मिलियन टन गहू रणनितिक भंडार म्हणून ठेवण्यात आला.
हा गहू पुढचे चार महिने आरामात पुरेल. कृषी मंत्री गोलामरेजा नूरी गेजेलजेह यांनी म्हटले की, बेकरींना तब्बल 2 महिन्यांचे पीठ देण्यात आले आहे. यादरम्यानच त्यांनी नागरिकांना आव्हान केले की, त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. युद्ध अधिक दिवस चालले तरीही नागरिकांना अन्नाची कमी होऊ नये, याकरिता मोठे पाऊल इराणकडून उचचली जात आहेत.