समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...
esakal March 30, 2026 06:45 PM

नुकतीच सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आलीये. लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं आकस्मिक निधन झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. अभिनेता शूटिंग संपल्यावर समुद्रात गेला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी प्रियांका सरकार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा काळ कुटुंबासाठी कठीण असल्याने त्यांना प्रायव्हसी देण्याचीही मागणी केलीये.

राहुल आणि प्रियंकाने २०१० मध्ये लग्न केलेलं, मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. तरीही, २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही मिळून आपल्या मुलाचा सांभाळ मिळून करत होते. आता पतीच्या मृत्यूनंतर प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केलीये. तिने लिहिलं, 'हा काळ आमच्यासाठी अत्यंत दु:खद आणि निराशेचा आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वांना विनंती करतो की, आम्हाला आमचा खासगी वेळ द्यावा. एका मुलाचे वडील, एका आईचा मुलगा आणि एका कुटुंबाचा आधार आम्ही गमावला आहे. आम्ही सर्वजण या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत.'

View this post on Instagram

A post shared by Priyanka Sarkar (@priyankasarkarz)