शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या.. महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नवीन नियम लागू, थेट..
Tv9 Marathi April 02, 2026 01:45 PM

1 एप्रिसपासून अनेक नियमात बदल करण्यात आली. विशेष म्हणजे ही नियम आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला हे नियम माहिती नसतील तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात. या योजनांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी फायदा घेतात. त्यामध्ये कर्जमाफी, पिक विम्यासारख्या योजनांचा समावेश असतो. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. 1 एप्रिलपासून सरकारने एका मोठ्या नियमात बदल केला आहे. त्यानुसार आपल्याला काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. जर आपण ही कागदपत्रे जमा केली नाही तर आपल्याला सरकारी योजनेंचा फायदा घेता येणार नाही.

MahaDBT चे अनुदान मिळणार नाही. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील विविध कृषी योजनांच्या अनुदानाची वाट पाहात आहेत. मात्र, या योजनांचे अनुदान हवे असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतील तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल. अथवा शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. मागील काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टलच्या कृषी योजनांचे अनुदान रखडले आहे.

आता टप्प्याटप्प्याने करून शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, आता अनुदान प्रक्रियेत काही बदल शासनाकडून करण्यात आली आहेत. 1 एप्रिलपासून नियमात बदल करण्यात आली. आधार आधारित पद्धत अनिवार्य करण्यात आली. महाडीबीटीवरून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवली जातात आणि आलेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाते आणि लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

यापूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान थेटपणे जायचे. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून 1 एप्रिलपासून आधार आधारित पेमेंट प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधारशी सलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करावे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना बँक खाते आधारसोबत संलग्न करणे आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.