शुक्रवारी मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे एक मोठा अपघात झाला. शृंगार घाटाजवळ स्टीमर उलटल्याने जवळपास डझनभर लोक बेपत्ता झाले. स्टीमरमध्ये सुमारे २५ जण होते असे वृत्त आहे. त्यापैकी बरेच जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आणि बचाव कार्याला गती देण्याचे आदेश दिले.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि डायव्हिंग टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. बचाव पथकांनी आतापर्यंत यमुना नदीतून १३ जणांना वाचवले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील भाविकांचा उत्तर प्रदेशात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू
डीआयजींनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दुपारी ३:१५ च्या सुमारास यमुना नदीत एक बोट उलटली. बोटीत अंदाजे २५ ते २७ लोक होते. प्राथमिक अंदाजानुसार, बोट एका तरंगत्या पुलाला धडकल्याने हा अपघात झाला. आतापर्यंत घटनास्थळावरून दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल होत आहेत. जे अद्याप बेपत्ता आहे, त्यांचा शोध सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी अपघाताबाबत दुःख व्यक्त केले.
ALSO READ: वन्यजीव संवर्धनावर लक्ष केंद्रित करणारे, वंताराने जगातील पहिले जागतिक विद्यापीठ सुरू केले
Edited By- Dhanashri Naik