सतीश शहांच्या पिंडदानाबाबत 'साराभाई vs साराभाई' फेम अभिनेत्यानं केला भावनिक खुलासा; म्हणाले " मुलं नसल्यानं ...'
जयदीप मेढे April 12, 2026 11:13 AM

Rajesh Kumar on Satish Shah: हिंदी टेलिव्हिजन आणि फिल्मी जगताचा दिग्गज अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संपूर्ण चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आयोजित ट्रिब्यूट सेरेमनीमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आता साराभाई VS साराभाई मालिकेत सतिश शहा यांच्यासोबत काम केलेले अभिनेते राजेश कुमार (Rajesh Kumar)यांनी एक भावनिक खुलासा केला. ‘साराभाई वर्सेस साराभाई’च्या टीमने सतिश शहा यांचं पिंडदान केल्याचं त्यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय.

मुलं नसल्याने टीमने उचलली जबाबदारी

साराभाई vs साराभाई मध्ये सतीश शाह यांच्यासोबत काम केलेल्या राजेश कुमारने सांगितलं की, सतीश शाह आणि त्यांच्या पत्नीला मुलं नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्मशांतीसाठी शोमधील सहकलाकारांनी पुढाकार घेत पिंडदान केलं.

राजेश कुमार म्हणाले, “सतीश सर खूपच उत्साही आणि दिलदार व्यक्ती होते. त्यांनी कधीही आपल्या शारीरिक त्रासाचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. ते डायलिसिसवर होते, किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं, पण त्यांनी कधीही निराशा दाखवली नाही. त्यांनी आयुष्य राजासारखं जगलं. सतीश शाह शम्मी कपूर यांच्यापासून खूप प्रेरित होते." राजेश कुमार यांनी पुढे सांगितलं " आजही ‘साराभाई’ ग्रुपमध्ये मेसेज करताना सतीश शाह यांची आठवण निघतेच. “जर ते आज असते, तर राकेश बेदी यांना मिळणाऱ्या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला असता,” असंही त्यांनी सांगितलं.

निधनाचं खरं कारण काय?

सुरुवातीला सतीश शाह यांचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, राजेश कुमारने नंतर स्पष्ट केलं की, त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं.

सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जाने भी दो यारो, में हूं ना, रा.वन, इश्क विश्क आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. सतीश शाह यांचं दिलदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची छाप आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे.त्यांचे डायलॉग्स आजही खळखळून हसवतात. सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचं अकाली जाणं फिल्म जगताला खूप मोठा धक्का होता. पण, तरीसुद्धा त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमधून ते कायम चाहत्यांच्या मनात असतील.

:

Rajesh Kumar: अभिनय सोडून शेतीत गेले,डोक्यावर 2 कोटींचं कर्ज; मुलांची फी भरण्यासाठी विकली भाजी, लोकप्रिय अभिनेत्याने 'असं' फेडलं कर्ज

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.