Chanakya Niti : या जगात स्वत:ला सिद्ध करायचं आहे? मग दररोज करा हे पाच कामं
Tv9 Marathi April 18, 2026 12:45 AM

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. मानवाने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही त्यांचे हे विचार अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य म्हणतात या जगात सर्वात जास्त अवघड कोणं काम असेल तर ते म्हणजे समाजात स्वत:ला सिद्ध करणं. समाजाला तुमची दखल घेण्यास भाग पाडणं. पुढे चाणक्य असंही म्हणतात की या जगात तुमच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात. तुमच्या कुटुंबात आई-वडील, तुमची पत्नी, तुमची मुलं असतात. त्या प्रत्येकाची तुमच्याबद्दलची असलेली अपेक्षा ही वेगळी असते. त्या सर्व अपेक्षा एकाचवेळी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. समाजाच्या अपेक्षाचं वझेही तुमच्यावर असते. अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागते. तर आणि तरच तुम्हाला या जगात मान-सन्मान मिळतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेच्या असतात.

दररोज सकाळी लवकर उठा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात मिळवायची आहे, असा निश्चय करतात, तेव्हा झोप विसरून जा. दररोज सकाळीच उठा, जे उशिरापर्यंत झोपून राहतात असे लोक कधीही आपलं ध्येय साध्य करू शकत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दिवसभरात काय करायचं आहे ते ठरवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा झोपेतून उठतात तेव्हा सर्वात आधी आज दिवसभरात तुम्हाला कोण कोणती कामं करायची आहेत ते निश्चित करा.

वेळेला महत्त्व – चाणक्य म्हणतात वेळ ही सर्वात मौल्यवान असते, त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.

जास्त ऐका कमी बोला – चाणक्य म्हणतात तुम्ही जास्तीत जास्त ऐका आणि कमी बोला हाच तुमच्या यशाचा मंत्र आहे.

आदर – चाणक्य म्हणतात आपल्या पेक्षा जे लोक वयानं आणि अनुभवानं मोठी आहेत, त्यांचा आदर करा

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.