'...मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा...'; 'कमळी' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, मराठीच्या मुद्द्यावर थेट म्हणाली...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 27, 2026 09:13 AM

Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) 1 मे 2026 (महाराष्ट्र दिन) पासून राज्यातील सर्व ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 'व्यवहारिक मराठी' अनिवार्य (Marathi Language Mandatory For Auto-Rickshaw And Taxi Drivers) केली आहे. या निर्णयानुसार, चालकांना मराठी (Marathi Language) वाचता, बोलता आणि समजता येणं गरजेचंच आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने (Permits) रद्द करण्याची किंवा नूतनीकरण न करण्याची चेतावणी परिवहन विभागानं दिली असून, या निर्णयाला चालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता हा मुद्दा केवळ मराठी भाषा अनिवार्य करण्याचा राहिलेला नाही. यावरुन आता केवळ महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण जगभरात राजकीय वाद तीव्र झाला आहे. 

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना (Auto-Rickshaw And Taxi Drivers) आता मराठी भाषेत बोलावं लागेल, मराठी बोलता, लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (State Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्तीची या राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात 4 मे पासून मुंबईतील 15 लाख रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यावरुन हे सर्व प्रकरण तापलं आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं या मुद्द्यावर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडलं आहे. अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टा हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

झी मराठीवरील (Zee Marathi) गाजत असलेल्या 'कमळी' (Kamali Marathi Serial) मालिकेतील सुषमा जयवंत (Sushma Jaywant) या मराठमोळ्या अभिनेत्रीनं रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य (Marathi Language Mandatory) करण्याच्या निर्णयावर आपलं मत मांडलंय. भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला 'तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?' हे बोलणारा मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा, असं अभिनेत्रीनं ठामपणे सांगितलंय. तसेच, आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला, असंही अभिनेत्रीनं म्हटलंय. 

मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत नेमकं काय म्हणाली? 

मराठी अभिनेत्री सुषमा जयवंतनं इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडीओमध्ये ती म्हणालीय की, "नमस्कार मी सुषमा जयवंत... एक मुद्दा मी आता बघितला. तुम्ही यूपीवाल्यांना जर मराठी येत नसेल, तर गाडी चालवून देणार नाही. मान्य आहे... खूप छान, पण जेव्हा ते परवाना घ्यायला येतात, तेव्हा सरकारकडून किंवा त्यांना जो परवाना मिळतो, तो दिलाच का जातो? तेव्हा का कुणी सक्ती करत नाही? दुसरा प्रश्न, भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा तो एखादा रिक्षावाल्याला 'तुम यहां पे आओगे क्या? ये भाजी कितने मे दी?' हे बोलणारा मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushma Jaywant (@sushmajaywant)

"तुम्ही स्वत: पहिल्यांदा मराठीत बोला... आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला... काय लॉजिक आहे? तुम्ही आपल्या मुलांना किती मराठी माध्यमात शिकायला पाठवत आहात? भाषेचं बंधन असणं, नसणं मला कळत नाही... पण हे जे काही 'तू गलत है, तू गलत है' चाललंय… त्यात तू पण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा... मला नक्कीच चर्चा करायला आवडेल…", असं अभिनेत्री सुषमा जयवंत हिनं शेवटी म्हटलं आहे. 

Utkarsh Shinde On Marathi Langauge Compulsion: 'मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही, म्हटल्यावर...'; अमराठी रिक्षा चालकांना मराठमोळ्या गायकाचा थेट इशारा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.