स्वस्तिक चिन्ह – वास्तुशास्त्रानुसार, मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह काढणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढल्याने घराची पवित्रता आणि शुद्धता टिकून राहते. याच कारणामुळे अनेक लोक विशेष प्रसंगी आणि सणांच्या वेळी मुख्य दारावर स्वस्तिक आवर्जून काढतात.
ओम चिन्ह – हिंदू धर्मात ओम हे सर्वात पवित्र चिन्हांपैकी एक मानले जाते. वास्तूच्या तत्त्वांनुसार, मुख्य प्रवेशद्वारावर ओम चिन्ह काढल्याने किंवा त्याचे स्टिकर लावल्याने घरातील सकारात्मकता वाढते. या प्रथेमुळे घरात शांततापूर्ण वातावरण निर्माण होते. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यालाही फायदा होतो.
शुभ-लाभ – मुख्य प्रवेशद्वारावर शुभ-लाभ लिहिण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. वास्तूशास्त्रानुसार, हा शब्दसमूह प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घराच्या बाहेरील बाजूस हे लिहिल्याने शुभ घटना लवकर घडतात. त्यामुळे घरात समृद्धी येते. तसेच, या प्रतीकातून निर्माण होणारी ऊर्जा कुटुंबातील सदस्यांना यशाच्या मार्गावर नेण्यास मदत करते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)