परभणी-जिंतूर महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक
अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले
विशाल शिंदे, परभणी
Parbhani Jintur ST Bus Accident 3 Dead परभणी-जिंतूर महामार्गावर भीषण अपघात घडला. जिंतूर तालुक्यातील कोक-पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भगवान काळे,सुशिलाबाई काळे आणि शिवम काळे अशी मृतांची नावे असून शिवम हा भगवान आणि सुशिलाबाई यांचा नातू होता.या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवळी येथील भगवान काळे, त्यांची पत्नी सुशिलाबाई काळे आणि त्यांचा १२ वर्षीय नातू शिवम काळे हे दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते. दरम्यान, परभणी-जिंतूर महामार्गावरील कोक-पिंपरी फाट्याजवळ त्यांची दुचाकी आणि समोरून येणारी एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.
Bribe Case : मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नोंदणीसाठी घेतली लाच; महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलंया अपघातात भगवान काळे, सुशिलाबाई काळे आणि शिवम काळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताची बातमी समजताच काळे कुटुंबीयांसह शेवळी गावावर शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेहअपघातानंतर एसटी बस चालक थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. दरम्यान, कोक–पिंपरी फाटा हा परभणी-जिंतूर महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी गतिरोधक व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.