वट पौर्णिमेचा उपवास 29 जून की 30 जून रोजी आहे? फक्त एका क्लिकने दूर करा तुमचा संभ्रम
Tv9 Marathi June 18, 2026 04:45 PM

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा वट पौर्णिमा हे व्रत हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अत्यंत विशेष आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सौभाग्यवती महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन मिळावे यासाठी दिवसभर उपवास करतात. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी देवी सावित्रीने आपल्या दृढनिश्चयाने यमराजाकडे आपले पती सत्यवान यांचा जीव परत देण्याची विनंती केली होती. त्यामुळे या कथेनुसार महाराष्ट्राभर सर्वत्र हा व्रत मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पाडला जातो. यावर्षी वट पौर्णिमेच्या तारखेबद्दल अनेक महिलांमध्ये काहीसा संभ्रम आहे की हा उपवास 29 जूनला करायचा आहे की 30 जूनला. चला, पंचांगानुसार हा संभ्रम दूर करूया आणि या उपवासाची तारीख, महत्त्व आणि अत्यंत सोपी पूजा पद्धत जाणून घेऊयात.

2026 मध्ये वट पौर्णिमा व्रत केव्हा आहे?

द्रिक पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 29 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजून 06 मिनिटांनी सुरू होईल. ही पौर्णिमा 30 जून 2026 रोजी पहाटे 5 वाजून 2‍6 मिनिटांनी संपेल. पौर्णिमा 29 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी असल्याने 2026 मधील वटपौर्णिमेचा उपवास सोमवार 29 जून रोजी पाळला जाईल.

वटवृक्षाची पूजा का केली जाते?

हिंदू धर्मात वटवृक्षाला अमरत्व आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की वटवृक्षाची पूजा केल्याने पती-पत्नीचे नाते अधिक दृढ होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. याशिवाय, हा उपवास स्त्रियांना संयम, समर्पण आणि कौटुंबिक मूल्यांशी जोडतो.

वट पौर्णिमा उपवासाची सोपी पूजा करण्याची पद्धत

वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि उपवास करण्याचा संकल्प करा. तांदूळ, फुले, पाणी, धूप, दिवे, जानवे, फळे आणि मिठाई यांसारखे पूजेचे साहित्य तयार करा. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन झाडाला पाणी अर्पण करा. वडाच्या झाडाच्या बुंध्याशी पूजेचे साहित्य अर्पण करा आणि दिवा लावा. मग झाडाला धाग्याचा किंवा जानव्याचा तुकडा गुंडाळा आणि त्याची प्रदक्षिणा करा. यानंतर सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐका किंवा तिचे पठण करा आणि आपल्या पती व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. शेवटी आरती करून पूजेची सांगता करा.

वट पौर्णिमेच्या उपवासाचे धार्मिक महत्त्व

वटपौर्णिमेचा उपवास सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी जोडलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतीवरील भक्ती, तपश्चर्या आणि दृढनिश्चयाने यमराजाकडून आपले पती सत्यवान यांचा जीव परत मिळवला. तेव्हापासून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी हा उपवास केला जातो. या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव वटवृक्षात वास करतात. त्याची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सुखी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.