सापांपासून वाचण्याचा सर्वात रामबाण उपाय; आदिवासींनी सांगितली सोपी ट्रीक, साप पुन्हा घराजवळ सुद्धा दिसणार नाही
Tv9 Marathi June 22, 2026 09:46 PM

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते बिळाबाहेर पडतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. अनेकदा तुमच्या घरात देखील त्यांना अशी जागा सापडू शकते. त्यामुळे साप घरात शिरतात. साप घरात शिरल्यानंतर ते अंधाऱ्या आणि अडचणीच्या जागी लपून बसतात. अशावेळी आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर आपल्यासोबत धोका होऊ शकतो, सर्पदंशाची शक्यता असते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे साप स्वत:हून कधीही तुमच्यावर हल्ला करत नाही मात्र त्याला जर धोका जाणवला किंवा ही आपली शिकार आहे, असा त्याचा समज झाला तर तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सतर्क रहाणं गरजेचं असतं.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही प्रजातीच या विषारी आहेत, ज्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे अशा काही प्रजातीचे नावं आपल्याला सांगता येतील. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सापांचं दर्शन होतं. जर तुम्हाला साप दिसलाच तर सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुमच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. सापाची माहिती ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी सोडतील.

सापांपासून पावसाळ्यात स्वत:च संरक्षण कसं करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेष: जे लोक ग्रामीण भागांमध्ये राहतात, किंवा जंगल परिसरात राहतात. त्यांना सापांचा अधिक धोका असतो. यावर एक सोपी ट्रीक आहे, ती म्हणजे तुम्ही जर घरात मांजर पाळली तर तुमचं सापांपासून संक्षण होईल. मांजरीचे डोळे हे खूप  तीक्ष्ण असतात, मांजर अंधारात देखील पाहू शकते, त्यामुळे साप कुठेही अंधारात लपून बसला असेल तरी तो तिच्या दृष्टीस पडतो आणि ती त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तुम्ही सावध होतात. शक्यतो ज्या घरात मांजर असते, त्या घरात साप फिरकत देखील नाही,  जे लोक ग्रामीण भागात राहतात किंवा जे आदिवासी आहेत, जे जंगल परिसरात राहतात, ते आपल्या घरात मांजर पाळतातच, त्यामुळे सापांपासून घराचं संरक्षण होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.