Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टींपासून कायम दूर रहा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
Tv9 Marathi July 05, 2026 11:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात कधी -कधी असे प्रसंग येतात, तीथे आपली खरी परीक्षा असते, मात्र तुम्ही जर अशा ठिकाणी तुम्ही संयम ठेवला तर तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनाल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जवळ केवळ संयम असून चालत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काही पथ्य देखील पाळावे लागतात. तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर अशा काही गोष्टी येतील त्या तुम्हाला हव्या हव्याशा वाटू शकतात. मात्र त्यापासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

परस्त्री – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीचं लग्न झालं आहे, अशा व्यक्तीने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. जर तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतर देखील एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होत असाल तर तुमच्या संसाराचं वाटोळं होण्यास फार काळ लागत नाही. तसेच यामुळे तुम्ही मोठ्या संकटात देखील सापडू शकतात, त्यामुळे लग्न झालेल्या माणसाने नेहमी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ रहावं, तसेच महिलांनी देखील आपल्या पतीसोबत एकनिष्ठ रहावं.

भूतकाळ – चाणक्य म्हणतात अनेक जण असे असतात, की त्यांच्या भूतकाळात त्यांच्यासोबत काही कटू घटना घडलेल्या असतात. परंतु अशा आठवणीमधून तुम्ही वेळीच बाहेर पडणं गरजेचं असतं. माणसाने नेहमी भविष्याचा विचार करून वर्तमानात जगावं, भूतकाळामध्ये आपल्यासोबत काय घडलं आहे? याचा जास्त विचार करू नये, भूतकाळातील चांगल्या आठवणी नेहमी सोबत ठेवा, कटू आठवणी विसरून जा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

जुगार – चाणक्य म्हणता जुगार हे एक असं व्यसन आहे, जे तुम्हाला लागलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतर कोणत्याही व्यसनापासून मुक्ती मिळू शकते, परंतु ज्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन लागलं आहे, तो व्यक्ती आपल्या संसाराचं पूर्णपणे वाटोळं करतो, त्यामुळे माणसाने कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

स्वार्थी मित्र – तसेच माणसाने आपल्या आयुष्यात स्वार्थी मित्रांपासून देखील दूर रहावं, असंही चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.