राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. 2025 च्या अखेरीस राज्यातील विविध ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडल्या होत्या. यात उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचाही समावेश होता. या नगरपरिषदेत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सत्ता मिळवली होती. मात्र आता ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द झालं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीला मोठा धक्काराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द करण्यात आलं आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्ष पद रद्द झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून मलगुडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इश्वरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी शिवसेनेच्या घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर निर्णय देताना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आता आगामी काळात नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता. आता सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदराव मलगुंडे यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.