कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहु आणि केतू या दोन छाया ग्रहांच्या मध्यभागी येतात, तेव्हा 'कालसर्प योग' निर्माण होतो. अनेकदा लोक या नावाला ऐकूनच घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या गूढ नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा विळखा सारखा नसतो.
काही लोकांच्या आयुष्यात हा दोष असूनही ते यशाची उंच शिखरे गाठतात, तर काही जणांना पावलोपावली संघर्षाचा सामना करावा लागतो. हा फरक पडतो तो तुमच्या पत्रिकेत कोणत्या स्थानात हा सर्प दोष ठाण मांडून बसला आहे यावर. म्हणूनच सरसकट भीती न बाळगता त्याचा खरा स्वभाव समजून घेणे गरजेचे असते.
सर्वात घातक आणि क्लेशदायक दोष१२ प्रकारांपैकी 'महापद्म' आणि 'घटक' हे दोन कालसर्प दोष सर्वात जास्त त्रासदायक मानले जातात. महापद्म दोष (जेव्हा राहु ६ व्या आणि केतू १२ व्या स्थानात असतो) हा माणसाला सतत गुप्त शत्रूंचा त्रास, कोर्ट-कचेऱ्यांचे वाद आणि कधीही न संपणाऱ्या कर्जाच्या खाईत लोटतो
दुसरीकडे, घटक कालसर्प दोष (राहु १० व्या आणि केतू ४ व्या स्थानात) थेट व्यक्तीच्या करिअर आणि कुटुंबावर आघात करतो. या दोषामुळे अत्यंत कष्ट करूनही कामाच्या ठिकाणी राजकारण सहन करावे लागते आणि हक्काच्या घरात कधीच मानसिक शांतता लाभत नाही.
Chaturmas Horoscope : चातुर्मास सुरू होताच 'या' 3 राशींसाठी धनलाभ योग; योग्य वेळी योग्य संधी मिळणार, रखडलेली कामे होणार फत्ते अचानक येणारी संकटे आणि कर्कोटकचा दंशअनेकदा सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक एखादे मोठे संकट कोसळते, यामागे 'कर्कोटक कालसर्प दोष' असू शकतो. जेव्हा राहु ८ व्या आणि केतू २ व्या स्थानात असतो, तेव्हा हा योग बनतो. हा दोष माणसाच्या आरोग्यावर आणि वाणीवर थेट परिणाम करतो.
अचानक होणारे अपघात, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद आणि अनपेक्षित धनहानी यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. या दोषाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना आयुष्यात अनेकदा अगदी शून्यापासून पुन्हा सुरुवात करावी लागते.
Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर कर्माची जोड आणि मुक्तीचा मार्गजरी हे दोष अतिशय वेदनादायी वाटत असले, तरी ते कायमस्वरूपी प्रगती रोखू शकत नाहीत. या दोषांचा मुख्य उद्देश व्यक्तीला कर्माची जाणीव करून देणे हा असतो. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी केवळ कर्मकांडावर अवलंबून न राहता, पक्ष्यांना धान्य देणे, गरजू लोकांना शनिवारी मदत करणे आणि भगवान शिवशंकराची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते.
जेव्हा तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिक ठेवता आणि अध्यात्माची कास धरता तेव्हा या कालसर्पाचा विषारी प्रभाव ओसरू लागतो आणि त्याच संघर्षातून एक कणखर व्यक्तिमत्त्व आकारास येते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.