Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौट आऊंगा...', अशी चिठ्ठी लिहीत बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीच्या ब्राह्मणगाव येथील राजे संभाजी गुरुकुल हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. रामू बळीराम गायकवाड असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारावीमध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. परभणीच्या ब्राह्मणगाव येथील राजे संभाजी गुरुकुल हॉस्टेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रामू बळीराम गायकवाड असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दोन दिवसांपासून अंग खाजवत असल्याने त्याने वडिलांकडून पैसे मागितले होते. वडिलांनी उपचारासाठी पैसे पाठवले होते.
मात्र त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नसल्याची माहिती समोर आली आहे,पोलिसांना विद्यार्थ्यांकडे "सबका /सभी का बदला लुंगा फिर लौटुंगा".असा मजकूर लिहलेली चिठ्ठी सापडली असल्याने एकच खडबळ माजली आहे. मुलाच्या वडिलांनी टाहो फोडला. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी वडिलांनी केली आहे.