टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.या दुसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशचा कॅप्टन नजमुल शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या स्टेडियममधील एव्हरेज स्कोअर हा 235 इतका आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांकडून विस्फोटक खेळी पाहायला मिळणार आहे.