नितीश रेड्डी याच्यानंतर टीम इंडियाचा युवा फलंदाज रिंकू सिंह याने अरुण जेटली स्टेडियममध्ये बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या टी20i सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. रिंकूने 16 व्या व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. रिंकूच्या टी 20i कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठोकलं. रिंकूने नितीश रेड्डीपेक्षा वेगवान अर्धशतक झळकावलं. रिंकूने फक्त 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 203.85 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. मात्र रिंकुला अर्धशतकानंतर एकही धाव जोडता आली नाही. रिंकुने अर्धशतकानंतर 2 बॉल डॉट केले. तर तिसऱ्या बॉलवर तो आऊट झाला. रिंकू अशाप्रकारे 29 बॉलमध्ये 53 धावांवर बाद झाला.
रिंकूने अर्धशतकानंतर काय केलं?
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.