आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या इंडिया पाकिस्तान आजच्या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक मध्ये देखील क्रिकेट प्रेमींमध्ये आजच्या सामन्याची उत्सुकता असून भारतच आजचा सामना जिंकेल असा आत्मविश्वास पाहायला मिळतोय.
तर अनेक क्रिकेट प्रेमींकडून आपापल्या आवडत्या खेळाडू कडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.
Chandrashekhar Bawankule : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टीयवतमाळ च्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच धारेवर धरले.
राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागात होते, असे असले तरी एसडीओ, तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही, वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाही, असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचे नाव महाराष्ट्रभर खराब होत आहे, त्यामुळे तुमची वेतनवाढ रोखायची का असेही बावनकुळे यांनी सुनावले.
Pune: पुण्यात कर्नाटकमधील बसला फासले काळेकर्नाटक मध्ये मराठी ड्रायव्हर वरती झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज पुणे स्वारगेट येथे काल रात्री स्वारगेटमध्ये शिवभक्तांच्या माध्यमातून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले...
बसला काळे फासण्यात आले....
कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली...
बसची तोडफोड करण्यात आली याचा निषेध म्हणून स्वारगेट मध्ये काल रात्री आंदोलन करण्यात आले...
Nanded: रोजगार मेळाव्यातून दीड हजार तरुणांना मिळाला रोजगार.नांदेड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी,यासाठी आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते.नांदेडच्या अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात दीड हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे.या मेळाव्यासाठी चार हजार स्थानिक तरुणांनी नोंदणी केली होती.150 हुन अधिक कंपन्यां या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.चार हजार तरुणांपैकी दीड हजार तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे.रोजगार मिळालेल्या या तरुणांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
Nagpur - 62 दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपीना अटक- नागपूर जिल्हातील विविध भागतील आणि गर्दीच्या ठिकाणावरूण दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक तर चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या दोन अशा एकूण 5 आरोपीना गुन्हा शाखेच्या युनिट 5 ने अटक केली.
- या आरोपींकडून 62 पेक्षा दुचाकी अंदाजे किंमत 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- बस स्थानक,मेट्रो स्टेशन, बॅक, गर्दीच्य ठिकाणावरून गाड्या चोरी करत होते.
- दुचाकी चोरीतील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले
- आकाश खोब्रागडे असं मुख्य आरोपीच नाव आहे. या दोन साथीदार आकाश परतेकी आणि क्रिश बारीक मदतीने चोरी करत होता...
- तिघे मिळून दुचाकी चोरी करून भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील गॅरेजचालवणाऱ्या आरोपी गोलू बिजांडे आणि दिपक बिजाडे याला विक्री करण्यासाठी देत होते.
- हे आरोपी ग्रामीण भागातील नागरीकान दुचाकी विकत असल्याचं तपासात समोर आले..
-
विषबाधेमुळे १५ शेळ्यांचा मृत्यू..रिसोड तालुक्यातील घटना...वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या औषध टाकीतील पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. टाकीमध्ये हळदीवर फवारणीसाठी औषध तयार करण्यात आले होते. आणि हे पाणी पिल्यामुळे १५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेळीपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लसणाचे भाव साडे पाचशे वरून 120 रूपयांवरमागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात लसूणाचे भाव वधारल्याने लसूणाची ठसण वाढली होती. लसूण बाजारात साडेपाचशे रुपये किलो दराने विकल्या जात होती. मात्र सध्या स्थितीत लसणाचे भाव 120 रुपये किलो एवढे असल्याने लसणाची ठसण उतरलीये. लसूण साडेपाचशे रुपये किलो पर्यंत तडकला होता. त्यामुळे गृहिणींना त्याचा वापर करताना हात आखडता घ्यावा लागत होता. आता नवीन लसुन बाजारात आल्याने आवक वाढली त्यामुळे किरकोळ भावात लसूण 120 रुपये प्रति किलो विकला जात आहे.
Maharashtra Live Update : स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस बंदकर्नाटकमध्ये महाराष्ट्रमधील एका एस टी बस चालकाला कन्नड बोलता नाही म्हणून मारहाण करून बसची तोडफोड करण्यात आली.त्याचा निषेध म्हणून काल परिवहन मंत्र्यांनी राज्यातून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या बस बंद
पुण्याच्या स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यात ६ बस दिवसभरात ये जा करत असतात.यामधील २ बिदर २ गुलबर्ग १ विजापूर १ गाणगापूर अशा बस जात असतात.
Akola : अकोल्यातल्या ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे भयावह दृश्यआता बातमी आहेय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय.. कारण, अकोट तालुक्यात संत्रा पिकावर देठसुकी नावाचा रोगामुळे संत्र्याला मोठी गळती लागलीय, अनेक शेतकऱ्यांना खर्च निघण कठीण झालाय.. काही शेतकऱ्यांचं एकरी 65 टक्के पीक धोक्यात आलेये. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे..
मागील हंगामात हेक्टरीमागे 15 लाखाच उत्पन्न झालं होत... मात्र, यंदा केवळ देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी 61 हजार रुपयांच संत्र्याचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आलंय. प्रत्येकी झाडातून 65 टक्के उत्पन्न वाया जातंये. अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे हे भयावह दृश्य सध्या पाहायला येतेये.. केवळ पस्तीस टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भाव अपेक्षाप्रमाणे नसल्याच शेतकरी सांगतात..
गावकऱ्यांची नदी स्वच्छतेची मोहीम, अंबरनाथ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्यपर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती एनजीओच्या माध्यमातून चामटोली, कोपऱ्याची वाडी, चिंचवली या गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदी पात्रात आज स्वच्छता मोहीम राबवली. या स्वछता मोहिमेत भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले होते. संस्थेचे सदस्य आणि गावकऱ्यांनी सकाळपासून या नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला आणि या नदीला कचरामुक्त करण्याचा प्रयत्न केला. आता या नदीमध्ये इथल्या स्थानिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपायोजना केल्या जाणार आहेत. हेच पाणी उल्हास नदीला येऊन मिळत असल्याने बदलापूर, अंबरनाथ कल्याणवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आता या नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण सगळ्यांनी हाती घेतली पाहिजे, असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केलं.
Satara : भारताच्या देश लष्कर सेवेत कार्यरत असणारा T 55 रणगाडा साताऱ्यात दाखलसातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच साताऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात आज पहाटे 4-5 च्या सुमारास T55 CAFVD रशियन मेड असणारा 38 टन वजनाचा रणगाडा लावण्यात आला आहे.. खासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय सेना बद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.. खासदार उदयनराजे भोसले यांनी 3 तास उभे राहून कामाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना देत रणगाडा बसवण्याचे काम सुरू केले..
SSC EXam : यवतमाळमध्ये 'साम टिव्ही'चा मोठा 'इम्पॅक्ट', मराठीचा पेपर व्हायरल करणारा अखेर अटकेतमराठीचा पेपर व्हायरल करणारा अखेर अटकेत,रात्री उशीरा महागांव पोलिसांनी केलीय अटक
केंद्रसंचालक अटकेत,पदावरून हटवले,दुसऱ्या आरोपीला ही अटक
यवतमाळच्या महागांव तालुक्यातील कोठारी येथिल आदर्श महाविद्यालयात मराठीचा पेपर केंद्रसंचालकाने व्हायरल केला.तद्नंतर चौकाशी दरम्यान चोळामोळा केलेली प्रश्न प्रश्न पत्रिका आढळून आल्याने केंद्रासंचालकांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आणि सर्व काही बाहेर आले
केंद्रासंचालक श्याम तास्के आणि अमोल राठोड या दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास महागांव पोलीस करित आहेत..
amrawati : तिवसा तालुक्यात रेड्याची झुंज.. रेड्यांची झुंज पाहण्यासाठी हजारोची गर्दीअमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सारशी येथील शेतशिवारात दोन रेड्यांची झुंज लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.. यावेळी रेड्याची झुंज पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती, रेड्याची झुंज लावणे कायद्याने बंदी असली तरी बेकादेशीररित्या ही झुंज लावण्यात आली, काही मिनिट दोन्ही रेडे आपापसात भिडले नंतर त्यांची टक्कर होताच दोन्ही रेड्यांनी पळ काढला,
Raigad : श्रीवर्धन मध्ये दगड, मातीचे बिनबोभाट उत्खननश्रीवर्धन तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती उत्खनन सुरू आहे. विकास कामांसाठी होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. दुसरीकडे ओव्हर लोड आणि वेगवान वाहतुकीमुळे अपघाताची भीती आहे. बागमांडले ते दिघी पर्यंत डोंगर पोखरले जात आहेत. त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते आहे. हे सर्व बिनबोभाट सुरू असताना संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करताना दिसत नाही.
Washim : केवळ २९५ हेक्टरवर उन्हाळी पेरणी....वाशिम जिल्ह्यात सरासरी ५९८९.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात जलस्रोतांची पातळी तळाला गेल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिना संपत येण्याच्या मार्गावर आला तरी केवळ २९५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण केवळ ४.९२ टक्के आहे. पेरणीसाठी कालावधी हाती असला तरी सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने यंदा क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
झालेल्या २९५ पेरणीत सर्वाधिक २४५ हेक्टर क्षेत्र केवळ उन्हाळी भुईमूग पिकाचेच आहे. कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. तर प्रकल्पांतील साठाही झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांची जोखीम पत्करण्यास धजावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Ambegaon- रस्त्यावर उभ्या कारला लागली आगआंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथे माळरानावरील रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत कार जळुन खाक झाली मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसुन कार मालकाच्या तक्रारीनंतर मंचर पोलिसांनी आकस्मित जळीत म्हणून या घटनेची नोंद केली आहे.
Agro News : टोमँटोच्या बाजारभावात कमालीची घट झाल्याने शेतकरी हतबल झालायउत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरुर तालुक्यात बाराही महिने टोमँटोचे उत्पादन घेतलं जातं हा टोमँटो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो टोमँटोनर मोठा भांडवली खर्च करुन उत्पादित केला जातो मात्र आता उत्पादन खर्चाच्या तुलनेत टोमँटोला मिळणारा बाजारभाव ४० टक्क्यांनी तोट्यात असल्याने शेतकरी हतबल झालाय दोन महिन्यापुर्वी टोमँटोला 500 ते 600 रुपयांचा बाजारभाव आता आगदी 150 ते 200 रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा व वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
Nashik : - महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी- महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी २ दिवस खुलं राहणार
- महाशिवरात्रीला बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार
- दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना पूर्व दरवाजातील दर्शन बारीतून देण्यात येणार प्रवेश
- या काळात व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्याचा निर्णय
- तर २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन ( पेड दर्शन ) देखील राहणार बंद
- महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टचा निर्णय
HSC Exam : गणिताच्या पेपरला ६६ कॉपी बहाद्दरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यात ६६ कॉपी बहाद्दर सापडले आहेत.
Pune : बाजार समित्यांची उद्या राज्यस्तरीय परिषदमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभापती उपसभापती आदींसोबत बाजार समितीचे कामकाज आणि त्या सुधारणा करण्यासाठी उद्या बाणेर येथील बंटारा भवन येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला प्रधानमंत्री जयकुमार रावल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सहकार पणन विभागाचे सचिव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती, संचालक,सचिव उपस्थित राहणार आहेत
मंडळाने पणन विकासासाठी आतापर्यंत केलेल्या कामकाज राज्यातील बाजार समितीचे कामकाजात करावयाच्या कालानुरूप बदल शेतमालाच्या विपनानामध्ये आधुनिक बाबी,शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यायच्या सोयी सुविधा याबाबत चर्चा होणार.