भारतीय सैन्यात गुरखा सैनिकांची नेपाळहूनही भरती केली जाते. ही एक अनोखी लष्करी परंपरा आहे.
कारगिल युद्धातील 1/11 गुरखा रायफल्सचे कर्नल ललित राय हे नेपाळी वंशाचे अधिकारी वीर चक्र विजेते आहेत.
गोरखा रेजिमेंटमधील अंदाजे 60 टक्के सैनिक नेपाळमधून तर उर्वरित भारतातील आहेत.
नेपाळमध्ये ब्रिटन, भारत आणि नेपाळ एकत्र येऊन गोरखांची भरती करतात. यात
लेखी + शारीरिक चाचणीचा समावेश आहे.
उत्तम पगारामुळे गोरखा उमेदवार पहिल्यांदा ब्रिटिश आर्मी निवडतात, त्यानंतर भारतीय आर्मी.
गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांचा पगार त्यांच्या पदावर अवलंबून असतो. सुरुवात 25,000 रुपयांपासून होते. निवृत्तीनंतर त्यांना भारतीय सैनिकांसारखेच वैद्यकीय व पेन्शनचे फायदे मिळतात.
ब्रिटिशांनी 1815 मध्ये पहिली नासिरी रेजिमेंट स्थापन केली होती, त्यानंतर गोरखा रेजिमेंट वाढत गेली.
स्वातंत्र्यानंतर भारत-नेपाळ-ब्रिटन त्रिपक्षीय कराराद्वारे गुरखा रेजिमेंटचे वाटप झाले.
भारताच्या सीमांवर आजही 35,000 नेपाळी सैनिक चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असून त्यांचं शौर्य, निष्ठा आणि योगदान आजही अमूल्य आहे.