विनायक दामोदर सावरकर यांची आज 142 वी जयंती आहे. त्यांना स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखलं जातं. प्रखर हिंदुत्वादी अशी त्यांची ख्याती आहे.
दरवर्षी 28 मे रोजी सावरकरांची जयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्याबाबतची महत्वाची माहिती जाणून घेऊ.
सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकजवळील भगूर येथे दामोदर आणि राधाबाई सावरकर यांच्या पोटी झाला. भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असण्यासह ते एक राजकारणी आणि उत्तम लेखक होते.
सावरकर जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते आणि ती समूळ नष्ट करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. 1937 ते 1943 या काळात सावरकरांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भुषवलं.
सावरकरांनी त्यांचे भाऊ गणेश सावरकर यांच्यासह 1904 मध्ये अभिनव भारत ही भूमिगत चळवळ स्थापन केली.
1906 मध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले. सावरकरांना विद्यार्थी अनुदानासाठी पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींमध्ये लोकमान्य टिळकांचा समावेश होता.
लंडनला पोहोचल्यानंतर लगेचच सावरकरांनी अभिनव भारत चळवळीसाठी भारतीयांना भरती करण्याचे प्रयत्न सुरू केले.
अटक क्रांतिकारी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सावरकरांना 1910 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने अटक करत त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला.
1911 साली सावरकरांना अंदमानातील सेल्युलर तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं. त्यांनी 12 वर्षे तुरुंगवास भोगला.