पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार डोके वर काढू लागतात. सध्या हवामानात होणाऱ्या बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यात भर आहे ती कोरोनाची. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोविड 19ची काही प्रकरणे हॉंगकॉंग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये आढळली आहेत. आता भारतातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत विविध संसर्गापासून शरीराचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही आरोग्यवर्धक काढ्यांचा समावेश करू शकता, जेणेकरून पावसाळ्यातील विविध संसर्गापासून शरीराचा बचाव होईल. आज आपण जाणून घेऊयात काही आरोग्यवर्धक काढे
तुळस आणि हळदीचा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
ज्येष्ठमध आणि आल्याचा काढा पावसाळ्यात विविध संसर्गांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असतो.
सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी हळदीचा काढा फायदेशीर असतो.
हेही पाहा –