सेंद्रिय शेतीमुळं भविष्य बदलतंय, आमच्या कार्यक्रमामुळं शेतकरी सक्षम, पतंजलीचा दावा
Marathi June 06, 2025 12:25 PM

शेतीच्या बातम्या: भारतीय कृषी क्षेत्रात आम्ही नवीन क्रांती सुरु केल्याचा दावा पतंजली आयुर्वेदन केला आहे. आमचा कृषी उपक्रम शाश्वत शेतीला प्रोत्साहन देतो, जो सेंद्रिय शेती, मातीचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित करतो असेही त्यांनी म्हटलं आहे. पतंजली केवळ शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करत नाही तर पर्यावरण संरक्षण आणि माती आरोग्याला देखील प्राधान्य देत आहे.

पतंजलीचा हा उपक्रम शाश्वत शेतीसाठी एक मोठे परिवर्तनकारी पाऊल मानले जाते. आमचे मुख्य लक्ष सेंद्रिय शेतीवर आहे, जे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून मातीची सुपीकता पुन्हा निर्माण करते. पतंजली किसान समृद्धी कार्यक्रमासारख्या प्रकल्पांद्वारे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. याद्वारे, शेतकरी केवळ त्यांच्या पिकांची गुणवत्ता सुधारु शकत नाहीत, तर उत्पादन खर्चात घट आणि उत्पन्नात वाढ देखील पाहू शकतात. या उपक्रमामुळे मातीचे आरोग्य दीर्घकाळ टिकण्यास मदत होते, जे शाश्वत शेतीचा आधार आहे.

सेंद्रिय उत्पादने रासायनिक रचना सुधारतात

याशिवाय, पतंजलीचा दावा आहे की त्यांची सेंद्रिय उत्पादने जसे की सेंद्रिय खत, सेंद्रिय सुभूमी आणि धरती का चौकीदार विकसित करण्यात आली आहेत, जी मातीची भौतिक आणि रासायनिक रचना सुधारतात. या उत्पादनांमध्ये ह्युमिक अॅसिड आणि मायकोरायझा सारखे नैसर्गिक घटक असतात, जे पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. हे केवळ पर्यावरणपूरक नाही तर शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्वापासून मुक्त करते, ज्यामुळे त्यांची शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. पतंजली किसान समृद्धी कार्यक्रमासारख्या प्रकल्पांद्वारे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा उद्देश

पतंलजलीने दिलेल्या माहितीनुसार,  कंपनीचा हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निष्पक्ष व्यापार पद्धतींद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगली किंमत मिळते. ज्यामुळं त्यांचे उत्पन्न वाढते. तसेच, डिजिटल साक्षरता आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच प्रदान करुन, पतंजली शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. या मॉडेलमुळे केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांनाच फायदा होत नाही तर स्थानिक समुदायांमध्ये रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीला देखील चालना मिळते.

महत्वाच्या बातम्या:

Organic Farming: सुपीक माती आणि आनंदी शेतकरी, जैविक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदललं?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.