भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेश संघात मोठा बदल दिसून आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खराब कामगिरीनंतर आता बांगलादेश एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला आहे. अष्टपैलू नजमुल हसन शांतोच्या जागी मेहदी हसन मिराजची बांगलादेश एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. नजमुल हसन शांतो सध्या बांगलादेश कसोटी संघाचा कर्णधार आहे.
मेहदी हसन मिराजला बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्याआधी तो गेल्या वर्षी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 4 एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व करताना दिसला होता. मेहदीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे, आतापर्यंत त्याने 4 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि बांगलादेशला सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मेहदी आता पुढील मालिकेत त्याचा खराब रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवल्यानंतर मेहदी हसन मिराज म्हणाले, “बोर्डने ही जबाबदारी सोपवणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. देशाचे नेतृत्व करणे हे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मला या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमच्याकडे निर्भय क्रिकेट खेळण्याची प्रतिभा आणि विश्वास आहे. आम्हाला आत्मविश्वासाने कामगिरी करावी, कोणत्याही अडथळ्यांशिवाय खेळावे आणि देशासाठी आमचे सर्वोत्तम काम करत राहावे अशी माझी इच्छा आहे.”
गेल्या वर्षी नजमुल हसन शांतोला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार बनवण्यात आला होता, परंतु तेव्हापासून त्याची कामगिरी खालावली आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो कर्णधारपदाचा दबाव सहन करू शकला नाही. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार बनवले आहेत. कसोटीत नजमुल हसन, एकदिवसीयमध्ये मेहदी हसन मिराज आणि टी-20 मध्ये लिटन दास कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसतील.