मुंबईत भीषण अपघात, डंपरने तिघांना चिरडले; संतप्त जमावाकडून तोडफोड, ठिय्या
Marathi June 14, 2025 10:24 PM

मुंबई : गेल्याच आठवड्यात लोकल रेल्वेतून अपघात झाल्याने 4 प्रवाशांचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच, आता मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागात एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) तिन्ही प्रवशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंकरोड वर शिवाजीनगर भागात हा अपघात झाला आहे. त्यावेळी, संतप्त जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी, जमावाकडून डंपरच्या काचा फोडून तोडफोड देखील करण्यात आली. त्यामुळे, या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल आहेत. संतप्त जमावाला समजावून ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं.

पालघरजवळ कंटेनराचा अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. पालघरच्या मेंढवण घाटात रसायन वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला असून मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनासोबत हा अपघात घडला. अपघातामुळे कंटेनरमधील रसायन हवेत पसरल्याने मोठ्या प्रमाणावर महामार्गावर धुराचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे, स्थानिक नागरिकांमध्ये, वाहन चालकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं. दरम्यान, सध्यामहामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

हेही वाचा

भाजप आमदाराचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न; जळगावात अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.