भरत गोगावले यांनी जी बगलामुखीची पूजा केली ती पूजा अघोरी पूजा नाही. असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. अघोरी पूजामध्ये एखाद्याचा बळी देणे, लिंबू ,टाचण्या आदींचा वापर असतो, शिवाय, अघोरी पूजा ही स्मशानात केली जाते मंदिरात नाही. हे सर्व प्रकार ज्यात येतात तो कायद्याने गुन्हा आहे. मात्र देवीचा होम हवन करणं याला आघोरी म्हणत नाहीत ती देवीची उपासना आहे. जर वसंत मोरेंकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते द्यावेत. होम हवन अघोरी प्रथांमध्ये येत नाही. असं अंधश्रद्धा निर्मूलन कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख म्हणाले आहेत.
जातनिहाय जनगणनाकेंद्र सरकारने आज देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे. २०२७ मध्ये ही जनगणना होणार असून ती दोन टप्प्यात केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे.
Harshvardhan Sapkal : इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळीइंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
Shivsena UBT : भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली, वसंत मोरेंचा दावा..भरत गोगावले यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेतील वसंत मोरे यांनी हल्लाबोल केलाय. ‘भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली’, असं वसंत मोरे यांनी म्हणत गंभीर आरोप केलेत. गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले.
Manoj Jarange Patil : आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही...मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्ही गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही. माझ्या समाजाने वाशी येथून परत जाऊन तुम्हाला वेळ दिला होता. आता मात्र आम्ही वापस जाणार नाहीत. आमची अडवणूक करू नका, आमची फसवणूक करू नका.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व पक्षीय आजी-माजी खासदार, आमदार अन् मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सगळ्या लोकप्रतिनिधींना फोन करून चर्चेसाठी या असे निमंत्रण जरांगे यांच्यावतीने पाठवण्यात येणार आहे. तसेच 29 आॅगस्ट रोजी मुंबईत दोन कोटी मराठा बांधव धडकणार आहेत. आम्ही शांततेत डाव टाकणार आहोत, पण सरकारने आगळीक केली तर रेल्वे, रस्ते आणि विमानतळंही बंद करू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Iran News : इराणध्ये दहा हजार भारतीय नागरिक अडकले..इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू आहे. सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. इराण सरकारने सांगितले आहे की जमीनी सीमा उघडण्यात आल्या आहेत. इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. इस्रायलशी झालेल्या संघर्षामुळे देशातील सर्व विमानतळ बंद आहेत.
Bacchu Kadu : अपात्रतेची कारवाई हा मी केलेल्या आंदोलनाचा परिणाम! बच्चू कडूंचा प्रहार..प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरलेलं आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून मी केलेल्या आंदोलनांचा हा परिणाम आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. या निर्णयात दबावतंत्र वापरलं गेलं असल्याचंही बच्चू कडू म्हणाले आहेत. सुनावणी अधिकारी हा एका मंत्र्याचा नातेवाईक असल्याचा दावाही त्यांनी केला.
Nashik News : बडगुजर, गीते यांचा भाजप प्रवेश ठरला, उद्याच प्रवेशाची शक्यता..भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांचा विरोध डावलून शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदाराला आव्हान देणाऱ्या गणेश गीते यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दोघांचाही प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dhananjay Mahadik News : राजकारणामध्ये चढउतार येत असतात, नाराज व्हायचं नसतं.. महाडिकांचा सतेज पाटलांना सल्ला!राजकारणामध्ये चढउतार येत असतात. मात्र, कधी नाराज व्हायचं नसतं. आम्ही कधी म्हटलं नाही की आम्ही एकटे पडलो आहोत. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये माझा घात झाला होता. विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता. गोकुळमधील आमची सत्ता गेली होती. मात्र, आम्ही कधी नाराज झालो नाही. आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
Chandrapur News : भाजप लबाड...भास्कर जाधवांनी उद्धव सैनिकांना केले अलर्टभाजप आपला जुना लाबड मित्र आहे. त्यांच्यापासून सावध राहा. आता महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना केली जात आहे. ते आपला फायदा आणि सोयीनुसार प्रभागातील मतदारांची कापाकापी करणार आहेत. त्याकडे लक्ष ठेवा, अशी धोक्याची सूचना माजी मंत्री तसेच उद्धव सेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना दिली.
Uddhav Thackeray : जगातल्या मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलायं..शिवसेना भवनात झालेल्या बैठकीदरम्यान, ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, मिंधे स्वत:ला मोदींचा घरगडी म्हणतो, घरगड्याची शेती बघा, शेतीत हेलिकॉप्टर, संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे. भाजप आणि मिंधे मुंबई आदानींच्या खिशात घालू पाहात आहेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. जगातल्या मोठ्या पक्षाचा बीएमसीमध्ये जीव अडकला आहे, अशीही टीका ठाकरेंनी केली आहे.
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत..मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 आॅगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहेत. आरक्षणाच्या मागणीवर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिली आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठवेत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.