हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे. गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, तर महाराष्ट्रात का लादतात, असा रोखठोक सवाल राज यांनी महायुती सरकारला विचारला. महाराष्ट्राचं हिंदीकरणं करण्याचं भाजपचा हा डाव आहे, असा घणाघात राज यांनी केला.
हिंदी हि काही राज्यांची भाषा आहे, ती राष्ट्रभाषा नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का? आयएएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये, म्हणून ही सक्ती करताहेत का? असा सवाल ठाकरे यांनी केला. या निर्णयामागे आयएएस लॉबीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळामध्ये हिंदी कशी शिकवली, तेच पाहतो, असे राज ठाकरे म्हणाले.
(न्यूज अपडेट होत आहे)