दोहे कबीरांचे
esakal June 22, 2025 01:45 PM

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

एक पुस्तक शोधत असताना काहीतरी पडल्याचा आवाज आला. पाहते तर एक छोटी पाॅकेट डायरी होती. मी काॅलेजमध्ये असतानाच भरली होती. मग इतकी का जपून ठेवली होती? असं काय होतं यात? तर कबीरजींचे दोहे. त्या वेळी वेगवेगळ्या लहान लहान वह्यांमधून काय काय उतरवून काढायचा नादच लागला होता. तशी ही एक दोह्यांची वही होती. दोन-दोन ओळींचा एक दोहा; पण केवढा मोठा विचार आणि किती रंजकता! ती एवढीशी वही पहाण्यात किती वेळ निघून गेला असता.

म्हणून आधी काम नीट पूर्ण केलं आणि मग एकेक पान उलटलं. एकेका छोट्या पानावर जणू एकेक ज्योत उजळत होती. आणि आजच्या काळाचं, अगदी स्वतःच्या अनुभवांचं प्रतिबिंबही त्यात पाहता येत होतं. अर्थातच प्रत्येकवेळी शब्दशः अर्थ न घेताही सांगड घालण्याचा प्रयत्न आनंदच देत होता. आता त्यापैकी हा एक दोहा पाहा-

चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय।

बैद बिचारा क्या करे, कहा तक दवा लगाय॥

चिंता या गोष्टीला कबीरजी चक्क डाकीण म्हणून संबोधतात. खरं तर चिंता करत राहणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नसतो. कधी कधी तर नसलेली समस्या उद्भवेल का याचीही चिंता वाटते. अशी चिंता फक्त पोखरत राहते, जी व्यर्थ असते. आपण वाचत आलेलो असतो, की चिता आणि चिंता यात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. त्यात चिता एकदाच जाळते आणि चिंता मात्र आयुष्यभर जाळते. म्हणून चिंता नको चिंतन हवे. असा हा चिंतेतला फोलपणा कितीही कळला, तरी वळला तर उपयोग! म्हणून आपल्याच आत असलेली ‘डाकीण’ हा शब्दप्रयोग मनोमन पटतो. अनेक आजार औषधाने बरे होतात; पण या चिंतेवर काही उपाय आहे का? कबीरजी उत्तर देत म्हणतात, ‘‘वैद्य म्हणा किंवा डाॅक्टर म्हणा! तो या बाबतीत बिचाराच ठरणार, किती काळ आणि कोणतं औषध देणार? या गोष्टीसाठी ‘मनोनिग्रह’ हेच औषध. चिंता न करणं हाच उपाय. मग तुम्ही स्वतःला इतर कशातही गुंतवा, जेणेकरून चिंता मनाला स्पर्श करताना विचारच करेल.

बाहेरचे उपाय फार बदल घडवत नाहीत, हा अनुभव तर मी स्वतःच घेतलाय. म्हणलं ना अनुभवाचं प्रतिबिंब. तेच हे. दहावीत असताना परीक्षेचं उगाच टेन्शन यायचं मला. डोकं चढायचं. मग काहीबाही उपाय शोधायचे. चहाच करून पी. नाहीतर हेडमसाज कर. थोडावेळ बरं वाटल्याचा भास व्हायचा. मग परत सुरू. जोवर आपण चिंतेला झटकत नाही ना, ती चिकटूनच बसते. काही वर्षांनी मात्र साक्षात्कार झाल्यासारखं झालं. उपाय सापडला तो एका गाण्यात. गाणं तर आधीही ऐकलं होतं, पण नव्याने अनुभवलं. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया’ तो मूड चिमटीत पकडायचा. मग तुम्ही आवडीचं काहीही करा. ठरलं. बऱ्यापैकी जमलं. नंतर मात्र चहा आणि तेल यांची साथ न घेताही तणावाला टाटा बाय बाय करू लागले.

जशी ही चिंता नावाची डाकीण, तसे अनेक शत्रू आपल्या आतच असतात. संशयामुळे आपल्याला आजूबाजूला शत्रू आहेत असं वाटतं; पण आतले शत्रू संपवले ना, तर बाहेर शत्रू असले, तरी ते आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत. मनाला कमकुवत करणारे आहेत तरी कोण हे? अनेक आहेत, जे दुर्गुण म्हणून ओळखले जातात ते आळशीपणा, भित्रेपणा, कचखाऊ वृत्ती किंवा कामक्रोधादि षडरिपू... यापैकी जे कुणी आपल्या आत ठाण मांडून बसतात ना, त्याने आपणच आपलं नुकसान करून घेतो. आणि याही बाबतीत दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी पटकन दिसतात; पण आरशात पाहताना याही दृष्टीने स्वतःकडे पाहायला हवं. असं कबीरजी सांगतात. डायरीच्या पुढच्या पानावर त्यांचे नेमके हेच शब्द होते.

बुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय।

मुझमें जो देखा मैंने मुझसे बुरा न होय॥

इतरांमधलं फक्त चांगलं पाहणं आणि स्वतःचे दोष ओळखणं हे दोन्ही अवघड आहे. त्यासाठी संतांच्या नजरेतून पाहणं तर अशक्यच वाटेल; पण आजच्या भाषेत त्याला आत्मपरीक्षण म्हणता येईल. आपलं ध्येय गाठण्यासाठी, स्वप्नपूर्तीसाठी, अगदी दैनंदिन जगण्यातही या गोष्टीची मदतच होते. आपण कुठे कमी पडतोय, त्यावर काम करणं नक्कीच कामी येऊ शकतं; पण दुसऱ्यातील चांगलंच कसं पाहता येईल? दोष तर सर्वांमध्ये असणार! मला वाटतं जे उत्तम नेतृत्व करतात, संघटन करतात, ते हे चांगल्या रितीने अमलात आणतात. म्हणजे त्या व्यक्तीचा कल पाहून त्या त्या गोष्टीचा चांगला उपयोग करून घ्यायचा. त्यादृष्टीने ही गोष्ट फार छान आहे.

एका शेतकऱ्याकडे दोन घागरी असतात आणि तो गरीब असल्यामुळे, त्यात त्याच्या गावात सोयीसुविधा नसल्यामुळे अक्षरशः पायपीट करून तो रोज पाणी आणायचा. वापरून वापरून त्याची एक घागर अगदी गळकी होते. निम्म पाणी गळण्यातच खर्च व्हायचं. याची पायपीट वाढायची; पण पर्याय नव्हता. यामुळे त्या घागरीलाच वाईट वाटतं आणि ती आपल्या मालकाकडे हे दुःख व्यक्तही करते. त्यावर हा शेतकरी हसून म्हणतो, अगं परत येताना मी तुला रस्त्याच्या कडेच्या बाजूने धरतो. त्या बाजूला मीच टाकून ठेवलेल्या बियांची आज कशी झाडं होऊन त्यांना फळंही लागली आहेत. ही तुझ्या गळण्याची किमया! थोडक्यात, कुठल्या गोष्टीकडे कसं पाहायचं हे आपल्याच हातात असतं.

याउलट ज्यांच्या नाकावर राग असतो, ते मागचा पुढचा विचार न करता बोलून जातात. आपल्यापैकी अशा लोकांसाठी कबीरजींनी दिलेली ही सावधगिरीची सूचना.

शब्द सम्हारे बोलिए शब्द के हाथ न पाव

एक शब्द औषधी करे एक शब्द करे घाव

शब्द ही खरंतर कुठली वस्तू नाही, की ज्याने शरीराला जखम होईल; पण शब्द त्याहीपेक्षा मोठी इजा करू शकतात ती मनाला. याच शब्दांनी वेदनांवर फुंकरही मारता येते. शब्द प्रेरणाही देऊ शकतात आणि वेदनाही. हा विचार मनात ठेवूनच त्यांचा वापर करायला हवा असा मोलाचा सल्ला कबीरजी देतात. बघा ना, व्यवसाय- धंद्यात तर जिभेवर साखर ठेवावीच लागते. संयम ठेवावा लागतो. नाहीतर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.

एका मुलाला असाच सतत राग यायचा आणि ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा तो वागायचा. ही सवय वेळीच बदलायला हवी असं त्याच्या वडिलांना जाणवतं आणि ते त्याला म्हणतात, तुला कुणाचा राग आला, की तू आपला या भिंतीवर खिळा ठोकत जा. भिंत भरत राहते. एकदा या मुलाला खिळा ठोकायचा कंटाळा येतो, मग तो गप्प बसतो. हळूहळू तो गप्प राहणं शिकतो आणि राग येणंही कमी होतं; पण जेव्हा तो पहिल्यांदा वडिलांना सांगतो, की आज मी खिळा ठोकलाच नाही. तेव्हा वडील म्हणतात, जेव्हा तुला जाणवेल, की आज आपण रागावर ताबा ठेवला, त्या दिवसभरात कधीही तू एकेक खिळा उखडत जा. त्याने तेही केलेलं असतं. आणि जेव्हा सगळे खिळे निघतात, तेव्हा तो वडिलांना बोलावून सांगतो, की आता खिळे ठोकावेही लागणार नाहीत आणि ठोकलेले सगळे काढूनही झाले. त्यावर वडील म्हणतात; पण तू भिंत पाहिलीस का? असेच घाव त्या त्या माणसाच्या मनावर बसतात आणि मग शब्द परत घेतले म्हणलं, तरी हे असे व्रण राहतात. आपला मुद्दा जरी योग्य असला, तरी तो मांडताना केलेली योग्य शब्दांची निवड पुढील परिणामांच्या दृष्टीने आवश्यक असते.

जसं रागामुळे नुकसान होतं, तसंच आजचं काम उद्यावर ढकलल्यामुळे! आणि नुसतं नुकसान होतं असं नव्हे, तर कुठल्या क्षणी काय घडेल याचा खरोखर नेम नसतो. समाजात दुर्दैवी घटनांची मालिका घडताना दिसते, तेव्हा आपण मनोमन हळहळतो, की या घटनाग्रस्तांनी काय काय स्वप्न पाहिली असतील, योजना आखल्या असतील आणि हीसुद्धा जाणीव होते, की हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं आणि अशावेळेस आपल्या हातात काहीच नसतं. शेवटचा क्षण कधीही येऊ शकतो. म्हणून जोवर आपल्या हातात आहे, तोपर्यंत चालढकल न करता कामं करत राहायला हवीत, म्हणजे निदान कर्तव्याच्या बाबतीत आपण अकारण कमी पडलो, असा पश्चात्ताप शेवटच्या क्षणी तरी होणार नाही. आपण आपल्याकडून १०० टक्के दिल्याचं समाधान तरी असेल. या दृष्टीने कबीरजींचे हे सर्वांना माहीत असलेले शब्द; पण कायम कर्तव्याप्रतीदेखील जागं ठेवणारे आहेत. म्हणून त्याच शब्दांनी समारोप करते.

कल करे सो आज कर आज करे सो अब।

पल मे प्रलय होएगी बहुरि करेगा कब ॥

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)एक पुस्तक शोधत असताना काहीतरी पडल्याचा आवाज आला. पाहते तर एक छोटी पाॅकेट डायरी होती. मी काॅलेजमध्ये असतानाच भरली होती. मग इतकी का जपून ठेवली होती? असं काय होतं यात? तर कबीरजींचे दोहे. त्या वेळी वेगवेगळ्या लहान लहान वह्यांमधून काय काय उतरवून काढायचा नादच लागला होता. तशी ही एक दोह्यांची वही होती. दोन-दोन ओळींचा एक दोहा; पण केवढा मोठा विचार आणि किती रंजकता! ती एवढीशी वही पहाण्यात किती वेळ निघून गेला असता. म्हणून आधी काम नीट पूर्ण केलं आणि मग एकेक पान उलटलं. एकेका छोट्या पानावर जणू एकेक ज्योत उजळत होती. आणि आजच्या काळाचं, अगदी स्वतःच्या अनुभवांचं प्रतिबिंबही त्यात पाहता येत होतं. अर्थातच प्रत्येकवेळी शब्दशः अर्थ न घेताही सांगड घालण्याचा प्रयत्न आनंदच देत होता. आता त्यापैकी हा एक दोहा पाहा-

चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय।

बैद बिचारा क्या करे, कहा तक दवा लगाय॥

चिंता या गोष्टीला कबीरजी चक्क डाकीण म्हणून संबोधतात. खरं तर चिंता करत राहणं हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नसतो. कधी कधी तर नसलेली समस्या उद्भवेल का याचीही चिंता वाटते. अशी चिंता फक्त पोखरत राहते, जी व्यर्थ असते. आपण वाचत आलेलो असतो, की चिता आणि चिंता यात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. त्यात चिता एकदाच जाळते आणि चिंता मात्र आयुष्यभर जाळते. म्हणून चिंता नको चिंतन हवे. असा हा चिंतेतला फोलपणा कितीही कळला, तरी वळला तर उपयोग! म्हणून आपल्याच आत असलेली ‘डाकीण’ हा शब्दप्रयोग मनोमन पटतो. अनेक आजार औषधाने बरे होतात; पण या चिंतेवर काही उपाय आहे का? कबीरजी उत्तर देत म्हणतात, ‘‘वैद्य म्हणा किंवा डाॅक्टर म्हणा! तो या बाबतीत बिचाराच ठरणार, किती काळ आणि कोणतं औषध देणार? या गोष्टीसाठी ‘मनोनिग्रह’ हेच औषध. चिंता न करणं हाच उपाय. मग तुम्ही स्वतःला इतर कशातही गुंतवा, जेणेकरून चिंता मनाला स्पर्श करताना विचारच करेल.

बाहेरचे उपाय फार बदल घडवत नाहीत, हा अनुभव तर मी स्वतःच घेतलाय. म्हणलं ना अनुभवाचं प्रतिबिंब. तेच हे. दहावीत असताना परीक्षेचं उगाच टेन्शन यायचं मला. डोकं चढायचं. मग काहीबाही उपाय शोधायचे. चहाच करून पी. नाहीतर हेडमसाज कर. थोडावेळ बरं वाटल्याचा भास व्हायचा. मग परत सुरू. जोवर आपण चिंतेला झटकत नाही ना, ती चिकटूनच बसते. काही वर्षांनी मात्र साक्षात्कार झाल्यासारखं झालं. उपाय सापडला तो एका गाण्यात. गाणं तर आधीही ऐकलं होतं, पण नव्याने अनुभवलं.

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया’ तो मूड चिमटीत पकडायचा. मग तुम्ही आवडीचं काहीही करा. ठरलं. बऱ्यापैकी जमलं. नंतर मात्र चहा आणि तेल यांची साथ न घेताही तणावाला टाटा बाय बाय करू लागले.

जशी ही चिंता नावाची डाकीण, तसे अनेक शत्रू आपल्या आतच असतात. संशयामुळे आपल्याला आजूबाजूला शत्रू आहेत असं वाटतं; पण आतले शत्रू संपवले ना, तर बाहेर शत्रू असले, तरी ते आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत. मनाला कमकुवत करणारे आहेत तरी कोण हे? अनेक आहेत, जे दुर्गुण म्हणून ओळखले जातात ते आळशीपणा, भित्रेपणा, कचखाऊ वृत्ती किंवा कामक्रोधादि षडरिपू... यापैकी जे कुणी आपल्या आत ठाण मांडून बसतात ना, त्याने आपणच आपलं नुकसान करून घेतो. आणि याही बाबतीत दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी पटकन दिसतात; पण आरशात पाहताना याही दृष्टीने स्वतःकडे पाहायला हवं. असं कबीरजी सांगतात. डायरीच्या पुढच्या पानावर त्यांचे नेमके हेच शब्द होते.

बुरा जो देखन में चला बुरा न मिलिया कोय।

मुझमें जो देखा मैंने मुझसे बुरा न होय॥

इतरांमधलं फक्त चांगलं पाहणं आणि स्वतःचे दोष ओळखणं हे दोन्ही अवघड आहे. त्यासाठी संतांच्या नजरेतून पाहणं तर अशक्यच वाटेल; पण आजच्या भाषेत त्याला आत्मपरीक्षण म्हणता येईल. आपलं ध्येय गाठण्यासाठी, स्वप्नपूर्तीसाठी, अगदी दैनंदिन जगण्यातही या गोष्टीची मदतच होते. आपण कुठे कमी पडतोय, त्यावर काम करणं नक्कीच कामी येऊ शकतं; पण दुसऱ्यातील चांगलंच कसं पाहता येईल? दोष तर सर्वांमध्ये असणार! मला वाटतं जे उत्तम नेतृत्व करतात, संघटन करतात, ते हे चांगल्या रितीने अमलात आणतात. म्हणजे त्या व्यक्तीचा कल पाहून त्या त्या गोष्टीचा चांगला उपयोग करून घ्यायचा. त्यादृष्टीने ही गोष्ट फार छान आहे.

एका शेतकऱ्याकडे दोन घागरी असतात आणि तो गरीब असल्यामुळे, त्यात त्याच्या गावात सोयीसुविधा नसल्यामुळे अक्षरशः पायपीट करून तो रोज पाणी आणायचा. वापरून वापरून त्याची एक घागर अगदी गळकी होते. निम्म पाणी गळण्यातच खर्च व्हायचं. याची पायपीट वाढायची; पण पर्याय नव्हता. यामुळे त्या घागरीलाच वाईट वाटतं आणि ती आपल्या मालकाकडे हे दुःख व्यक्तही करते. त्यावर हा शेतकरी हसून म्हणतो, अगं परत येताना मी तुला रस्त्याच्या कडेच्या बाजूने धरतो. त्या बाजूला मीच टाकून ठेवलेल्या बियांची आज कशी झाडं होऊन त्यांना फळंही लागली आहेत. ही तुझ्या गळण्याची किमया! थोडक्यात, कुठल्या गोष्टीकडे कसं पाहायचं हे आपल्याच हातात असतं.

याउलट ज्यांच्या नाकावर राग असतो, ते मागचा पुढचा विचार न करता बोलून जातात. आपल्यापैकी अशा लोकांसाठी कबीरजींनी दिलेली ही सावधगिरीची सूचना.

शब्द सम्हारे बोलिए शब्द के हाथ न पाव

एक शब्द औषधी करे एक शब्द करे घाव

शब्द ही खरंतर कुठली वस्तू नाही, की ज्याने शरीराला जखम होईल; पण शब्द त्याहीपेक्षा मोठी इजा करू शकतात ती मनाला. याच शब्दांनी वेदनांवर फुंकरही मारता येते. शब्द प्रेरणाही देऊ शकतात आणि वेदनाही. हा विचार मनात ठेवूनच त्यांचा वापर करायला हवा असा मोलाचा सल्ला कबीरजी देतात. बघा ना, व्यवसाय- धंद्यात तर जिभेवर साखर ठेवावीच लागते. संयम ठेवावा लागतो. नाहीतर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.

एका मुलाला असाच सतत राग यायचा आणि ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा तो वागायचा. ही सवय वेळीच बदलायला हवी असं त्याच्या वडिलांना जाणवतं आणि ते त्याला म्हणतात, तुला कुणाचा राग आला, की तू आपला या भिंतीवर खिळा ठोकत जा. भिंत भरत राहते. एकदा या मुलाला खिळा ठोकायचा कंटाळा येतो, मग तो गप्प बसतो. हळूहळू तो गप्प राहणं शिकतो आणि राग येणंही कमी होतं; पण जेव्हा तो पहिल्यांदा वडिलांना सांगतो, की आज मी खिळा ठोकलाच नाही. तेव्हा वडील म्हणतात, जेव्हा तुला जाणवेल, की आज आपण रागावर ताबा ठेवला, त्या दिवसभरात कधीही तू एकेक खिळा उखडत जा. त्याने तेही केलेलं असतं. आणि जेव्हा सगळे खिळे निघतात, तेव्हा तो वडिलांना बोलावून सांगतो, की आता खिळे ठोकावेही लागणार नाहीत आणि ठोकलेले सगळे काढूनही झाले. त्यावर वडील म्हणतात; पण तू भिंत पाहिलीस का? असेच घाव त्या त्या माणसाच्या मनावर बसतात आणि मग शब्द परत घेतले म्हणलं, तरी हे असे व्रण राहतात. आपला मुद्दा जरी योग्य असला, तरी तो मांडताना केलेली योग्य शब्दांची निवड पुढील परिणामांच्या दृष्टीने आवश्यक असते.

जसं रागामुळे नुकसान होतं, तसंच आजचं काम उद्यावर ढकलल्यामुळे! आणि नुसतं नुकसान होतं असं नव्हे, तर कुठल्या क्षणी काय घडेल याचा खरोखर नेम नसतो. समाजात दुर्दैवी घटनांची मालिका घडताना दिसते, तेव्हा आपण मनोमन हळहळतो, की या घटनाग्रस्तांनी काय काय स्वप्न पाहिली असतील, योजना आखल्या असतील आणि हीसुद्धा जाणीव होते, की हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं आणि अशावेळेस आपल्या हातात काहीच नसतं. शेवटचा क्षण कधीही येऊ शकतो. म्हणून जोवर आपल्या हातात आहे, तोपर्यंत चालढकल न करता कामं करत राहायला हवीत, म्हणजे निदान कर्तव्याच्या बाबतीत आपण अकारण कमी पडलो, असा पश्चात्ताप शेवटच्या क्षणी तरी होणार नाही. आपण आपल्याकडून १०० टक्के दिल्याचं समाधान तरी असेल. या दृष्टीने कबीरजींचे हे सर्वांना माहीत असलेले शब्द; पण कायम कर्तव्याप्रतीदेखील जागं ठेवणारे आहेत. म्हणून त्याच शब्दांनी समारोप करते.

कल करे सो आज कर आज करे सो अब।

पल मे प्रलय होएगी बहुरि करेगा कब ॥

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)शब्द ही खरंतर कुठली वस्तू नाही, की ज्याने शरीराला जखम होईल; पण शब्द त्याहीपेक्षा मोठी इजा करू शकतात ती मनाला. याच शब्दांनी वेदनांवर फुंकरही मारता येते. शब्द प्रेरणाही देऊ शकतात आणि वेदनाही. हा विचार मनात ठेवूनच त्यांचा वापर करायला हवा, असा मोलाचा सल्ला कबीरजी देतात. व्यवसाय- धंद्यात तर जिभेवर साखर ठेवावीच लागते. संयम ठेवावा लागतो. नाहीतर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.