इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये इराणसोबतच इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर अखेर आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे. युद्धविराम झाल्यानंतर इराणने भारताचे आभार मानले आहेत. इस्रायलसोबत झालेल्या युद्धादरम्यान भारताकडून मिळालेल्या समर्थनासाठी इराणने भारताचे आभार मानले आहेत. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये इराणने भारताचे आभार मानले आहेत. सोबतच या पोस्टमध्ये इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील भागीदारीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
इराणने काय म्हटलं?
अमेरिका आणि इस्रायलसारख्या राष्ट्रानं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचा विजय झाला आहे.हा एक ऐतिहासिक असा विजय आहे. त्यासाठी इराणचा दूतावास भारतातील सर्व महान आणि स्वतंत्रताप्रेमी नागरिक, राजकीय पक्ष, संसदेतील सर्व सदस्य, धार्मिक आणि आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ता आणि भारतीय मीडियाचे आम्ही आभारी आहोत, जे युद्धासारख्या कठीण प्रसंगात आमच्यासोबत उभे राहिले.
भारताचे आभार मानताना इराणने म्हटलं आहे की, भारतासारख्या महान राष्ट्रातील लोकांनी आणि संस्थांनी आम्हाला दिलेल्या खऱ्या आणि अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो, निःसंशयपणे यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, आणि मानवतावादी संबंधांना चालना मिळणार आहे.
इराणचं किती नुकसान?
या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, इराणच्या अनेक महत्त्वाच्या संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक महत्त्वाची विमानतळं आणि पायाभूत सुविधा बेचिराख झाल्या आहेत. अमेरिकेकडून इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये इराणच्या या अणुऊर्जा केंद्रांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
इस्रायलचं देखील प्रचंड नुकसान
या युद्धामध्ये इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली होती, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले होते, त्यामुळे इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे.