ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ यात्रेत मोठी गर्दी झाली असून यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या चेंगराचेंगरीत ५०० जण जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
Nashik Live : मामा राजवाडे शिवसेना ठाकरे गटाचे नवीन महानगर प्रमुखविद्यमान महानगर प्रमुख विलास शिंदे याच्या नाराजी नाट्यानंतर विलास शिंदे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. विलास शिंदे रविवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याआधीच विलास शिंदे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. यानंतर मामा राजवाडे यांच्यावर पक्षानं महानगरप्रमुखाची नवी जबाबदारी दिली.
Kolhapur Live : महाराष्ट्र चेंबरचा प्राडाला कोल्हापुरी हिसकाप्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवत इटली येथील प्राडाचे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी ही कोल्हापुरी चप्पल असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.
Rain News: निफाडच्या कादवा नदीला आला पूरगेल्या दोन महिन्यापासून निफाड शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने निफाड तालुक्यातील गोदावरी कादवा बानगंगा या नद्यांना पूर आला आहे. तर पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने निफाडची कादवा दुथडी भरून वाहत आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Mumbai News: धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र लोकांची पहिली यादी जाहीरधारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र लोकांची पहिली यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत अवघ्या 25 टक्के लोकांना पात्र दर्शविले. अपात्र झालेल्या रहिवाशांमध्ये आता गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असेल. अपात्र झालेले रहिवासी आज शिवसेना भवन येथे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
51 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवडफुलंब्री तालुक्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षात खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 51 हजार 113 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाने सुरवातीलाच चांगली हजेरी लावल्याने खरीप पिकांची शेतकऱ्यांकडून झपाट्याने झाली आहे.
Pune News: अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे : शिवहार लहानेपुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी ला अध्यापन करणाऱ्या बहुसंख्य शिक्षकांना प्रशासनाकडून बी .एल. ओ चे काम देण्यात आलेले आहे. या कामाकरिता वर्षातील अनेक दिवस शालेय कामकाज सोडून आपल्या दिलेल्या प्रभागामध्ये फिरावे लागते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही.
Nashik News: महाराजस्व समाधान शिबिरातून ३१९ लाभार्थ्यांना मिळाला लाभ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानातंर्गत वणी, ता. दिंडोरी मंडळात विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिका, जिवंत ७/१२ वारस नोंदी उतारे वाटप, आयुष्यमान कार्ड, बियाने वाटप, रोप वाटप आदींचे वाटप करण्यात आले. शिबिरात ३१८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. दिंडोरी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसिलदार मुकेश कांबळे आदींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
रेल्वेप्रवाशांकडून अवैध वसुली पडली महागातगेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये, विशेषतः सामान्य डब्यांमध्ये, तृतियपंथीयांची एक टोळी प्रवाशांकडून मानसिकदृष्ट्या धमकावून आणि धमकी देऊन जबरदस्तीने रोख रक्कम आणि ऑनलाइन वसूल करत असल्याच्या तक्रारीवरुन पोलिस निरीक्षक पी. आर. मीना व त्यांच्या विशेष पथकाने सहा तृतीयपंथीयांच्यां टोळी सह दोन टोळीप्रमुख असे आठ संशयीतांना अटक करून त्यांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी एक महीना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Live: शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र संतापदेशाच्या भाषिक विविधतेचा सन्मान राखणे आणि सर्व भाषांना समान अधिकार देणे हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.
परंतु सध्या महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासून सक्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याचा मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने पत्रकाद्वारे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
याबाबत मंचच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सर्व शिक्षणप्रेमी, पालक, आणि सामाजिक संघटनांना आवाहन करतो की त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मुलांच्या भाषिक स्वातंत्र्यासाठी उभे राहावे.
माजी खासदार हुसेन भाई दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मौलाना आझाद विचार मंचने असे पत्रक मंचचे वरिष्ठ उपाध्यक्ष हसीब नदाफ, उपाध्यक्ष रुफी भूरे, मुज्जमिल खान यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Live: दीघा रथयात्रेला भव्य सुरुवात, ममता बॅनर्जी यांनी केली आरतीपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दीघा येथील भगवान जगन्नाथ मंदिरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेच्या प्रारंभावेळी आरती केली.
Solapur Live: मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात २५ रुग्ण पुण्याकडे रवानापूर्व विभाग मानाचा ताता गणपती ट्रस्टच्यावतीने एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे व श्री गुजराथी मित्र मंडळ यांच्यातर्फे मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होऊन त्यात १६० लोकांची नोंद झाली. त्यात १५२ लोकाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.
पहिल्या टप्प्यात त्यातील २५ रुग्णांन बसने पुणे येथे एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाला पाठविण्यात आले. या सर्वांवर आज शनिवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.
उर्वरित रुग्णांवर टप्याटप्याने शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले. तरी लाभार्थी रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वेळी रुग्णाचे रेशन कार्ड व आधारकार्ड पूर्व विभाग ताता गणपती मंडळाचे कार्यालयात जमा करावे, असे आवाहन श्रीनिवास साका व हरी ओम संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत दंडी यांनी केले आहे.
Bhandara Live: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरीजून महिन्याच्या अखेरीस आता भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली. भात पिकाची नर्सरी पाण्याअभावी करपायला लागली होती. मात्र, मुसळधार पाऊस होत असल्यानं नर्सरीला जीवदान मिळालं असून भंडाऱ्यातील पेरणीची आता लगबग बघायला मिळणार आहे.
Palghar Live Updates: पालघरच्या हनुमान नगर येथे तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू- पालघरच्या हनुमान नगर येथे तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
- पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी तिघांचा पाण्यात बुडवून मृत्यू
- खाजगी जमिनीत खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यू, तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश, घटनेने परिसरात हळहळ
Yawatmal Live Updates: यवतमाळमधील येवती मार्गावरील तात्पुरता पूल गेला वाहून- यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.
- या मार्गावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे, त्यामुळे बाजूनेच तात्पुरता पूल तयार करण्यात आला परंतु पहिल्याच पावसात येथून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे मातीचा भराव खचून पूल खचला.
- मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Live Update: डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई,दोन किलो एमडी ड्रग्स जप्तडोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ही ठोकल्या बेड्या आरोपी मध्ये दोन पुरुष एक 21 वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्राचे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत करत होते. एमडी ड्रग्सची तस्करी हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाणे सह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती
Live Update: देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या संदर्भात बैठकदेवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या संदर्भात बैठक,यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संबंधित अधिकार्यांची उपस्थिती.
संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर मधील सणसर या ठिकाणी मुक्कामी आहे तत्पूर्वी काटेवाडी मध्ये पालखी समोर मेंढ्यांचे रिंगण पार पडले.
डोक्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. केसकर कुटुंबियांच्या मेंढ्या या रंगवण्यात आल्या होत्या.
परंपरेनुसार काटेवाडी मध्ये विश्रांती घेतल्यानंतर मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडलं.
पालखी रथासमोर आखून दिलेल्या गोलात मेंढ्या पळत होत्या आणि हा सोहळा पाहण्यासाठी फक्त काटेवाडी मधीलच नव्हे तर पंच क्रोषीतील गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
Pune Live : पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापरविनापरवाना ९ ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडले
पुणे पोलिसांनी जप्त केले विनापरवाना ड्रोन
पोलिसांकडून ड्रोन मालकांची सुद्धा चौकशी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची करडी नजर
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने परभणीत आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात लोणीकर यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आमदार लोणीकर यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
Nanaded Live : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीसुमारे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 60 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित 40 टक्के पेरण्यांनाही आता गती मिळण्याची शक्यता आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील 95 महसूल मंडळांपैकी तब्बल 39 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, विशेषतः माहूर मंडळात विक्रमी 156 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai Live: शालेय शिक्षण अभ्यास कृती समिती मोर्चात सहभागी होणारशालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती देखील पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि सात जुलै च्या धरणे आंदोलनावर देखील कृती समिती ठाम आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सरकार हे एका आंदोलनामुळे बदलणार नाही त्यामुळे आमची ही दोन आंदोलने आम्ही रद्द करणार नसल्याचं कृती समितीचे दीपक पवार यांच्याकडून सांगण्यात आलं.
Nagpur Live: नागपूरमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, दोन जखमीनागपूरात कचरा उचलणारा ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात झाला. वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात घटनास्थळीच 1 जणाचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. नितीन पंजेश्वर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव तर दोन जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कचरा संकलन करणाऱ्या ट्रकच्या चालकाला वाहनासह वाठोडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
Sambhaji Nagar Live: ड्रायव्हरला मिळालेल्या जमिनीचा आमचा काहीही संबंध नाही- भूमरेड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीची आमचा काही संबंध नाही. तो सकाळी ड्युटीला येतो आणि संध्याकाळी जातो. त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे असं शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्याची जागा खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरला सालारजंग कमिटीने जमीन गिफ्ट दिल्यावरून सध्या दोघेही चर्चेत आले आहेत. रेडी रेकनर दरानुसार तब्बल दीडशे कोटीची ही जागा ड्रायव्हरने कशी खरेदी केली असा प्रश्न उपस्थित झालाय. सध्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
Live : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना" – चंद्रकांत खैरे५ जुलै रोजीच्या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असून, ही त्यांच्या एकत्र येण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते ३-४ वेळा एकत्र आले आहेत. महाराष्ट्राला योग्य नेतृत्व देण्याची क्षमता प्रबोधनकार ठाकरे यांच्याच वंशात आहे, असं मत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, "उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशीच प्रार्थना आज पांडुरंगाच्या चरणी केली."
Live : संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत उत्साहात आगमनसंत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी येथे पोहोचली असून, परिसरात भक्तिमय वातावरण आहे.
परीट समाजाच्या वतीने पालखीच्या स्वागतासाठी पायघड्यांप्रमाणे धोत्र्यांची अंथरूण घालून आदरांजली वाहण्यात आली.
या ठिकाणी तुकोबांच्या पालखीला थांबा देण्यात आला असून, येथे पालखीची विश्रांती घेण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिना'ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करत आहेत.
बिरवाडी नजीक लघू पाटबंधारे विभागाच्या बांधाऱ्या नजीकची घटना
महाड MIDC पोलिस घटनास्थळी दाखल
अंदाजे 40 ते 50 वर्षाची व्यक्ती असल्याचा अंदाज
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी MIDC पोलिसांचे प्रयत्न
सदर मृतदेह हा अतीवृष्टी दरम्यान वाहून गेलेला व्यक्तीचा असावा की घातपाताच प्रकरण या बाबत पोलिस तपास सुरु
Mumbai Live : मुंबई-गोवा महामार्गावर कंटनेर आणि दुचाकीचा अपघातचिपळूण नजिकच्या सावर्डे येथे झाला हा अपघात..
कंटेनरच्या धडकेने मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू...
घटनास्थळी पोलीस दाखल..
Washim Live: वाशिममध्ये पुराच्या पाण्यात पुलाचा भाग वाहून गेला तालुक्याशी संपर्क तुटला...वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतीचा प्रचंड नुकसान झालं आहे , यात उतावळी नदीला पूर आल्यामुळे या पुराच्या पाण्यात कुकसा ते रिसोड या मार्गावरील पूलाचा भाग वाहून गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
अंबादास दानवे यांची स्पष्ट भूमिका: ठाकरे बंधू एकत्र येणार, हेच जनतेचं अपेक्षित चित्र!संभाजीनगरमध्ये बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "मोर्चा एकत्र येणार, हे सत्य आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र यावेत, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे," असं ते म्हणाले. सध्याच्या राजकारणात काही लोक मोदींसाठी चमचागिरी करत आहेत, अशी टिका करत त्यांनी स्पष्ट केलं की, एकत्र येण्यासाठी कुठलीही हरकत नाही, कारण विचार आणि मन दोघांचं एकच आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चर्चा सुरू झाली आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारानाशिक – गंगापूर धरणातून आज सकाळी १० वाजल्यापासून २,७२० क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांत टप्प्याटप्प्याने विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिणामी, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठीसाठी ठाकरे एकत्र येण्याची गरज – प्रकाश महाजन यांची भावनाराज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे स्वप्न पाहायला हरकत नाही, असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्र धर्माचे संरक्षण हे ठाकरे कुटुंबाचे मूळ बिंब असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मराठी जनतेसाठी दिलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास, ही मराठी अस्मितेसाठी स्वागतार्ह बाब ठरेल. हिंदी सक्तीविरोधात मराठीसाठी कोणी तरी उभं राहणं गरजेचं होतं आणि आज त्याची सुरुवात झाल्याचे ते म्हणाले. मराठी माणसासाठी राजकारणाच्या पलिकडे विचार करून एकत्र यावं, हेच बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. पुढील दहा वर्षांत मुंबईत होणाऱ्या प्रगतीच्या लाटेत मराठी माणूस मागे पडू नये, यासाठी हे एकत्र येणं आवश्यक आहे. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात सदैव प्रभावी राहणार असून, राज ठाकरे राजकारणात असताना तो कोणीही संपवू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Vidarbha Live: विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांना सुरुवात; कवडसमध्ये पारंपरिक नृत्यातून ‘प्रवेशोत्सव’कवडस येथील आश्रमशाळेत शिक्षण वर्षाची सुरुवात, मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्याद्वारे स्वागत केलं; शिक्षणाची आवड वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद.
"मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर हा आनंदाचा क्षण," अशी X वरील पोस्ट.
शुक्रवारी पुरीमध्ये रथयात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सर्व देशवासीयांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Mumbai Live : हिंदीविरोधात ठाकरे बंधूचा एकच एकत्र मोर्चा निघणारहिंदीविरोधात ठाकरे बंधूचा एकत्र आणि एकच मोर्चा 5 जुलैला मोर्चा निघणार असल्याचे संजय राऊत आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
Sharad Pawar : पहिली ते चौथी हिंदी सक्ती योग्य नाही पण... शरद पवारांचा हिंदीबाबत पुनरुच्चारराज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची करणे योग्य नाही, मातृभाषा महत्वाची आहे. मुलांना पाचवीपासून हिंदी शिकविण्यास हरकत नाही, हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Jagannath Yatra Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगन्नाथ यात्रेनिमित्त दिल्या शुभेच्छापुरीमध्ये आज रथयात्रा उत्सव साजरा केला जात आहे आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. कडक सुरक्षेत लाखो भाविक वार्षिक उत्सव पाहणार असल्याने नागरी आणि पोलिस प्रशासन हाय अलर्टवर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगन्नाथ यात्रेनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Pune Live : स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपीच्या जामीन अर्जावर आज निर्णयस्वारगेट बलात्कार प्रकरणी दोन्ही बाजूच म्हणणं ऐकून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे