मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी आज सकाळी पतधोरण विषयक बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी रेपो रेट कायम ठेवला जाणार असल्याचं जाहीर केलं. सरकारच्या धोरणानुसार यूपीआय पेमेंटसला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं म्हटलं. यूपीआय कायम फ्री राहण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मी कधीच नाही म्हटलं की यूपीआय कायमस्वरुपी फ्री राहील. आता देखील ते पूर्णपणे फ्री नाही, कोणीतरी त्याचा खर्च उचलत आहे, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.
संजय म्हलोत्रा यापुढं म्हणाले की कुठे ना कुठे याचा खर्च दिला जात आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की हा खर्च कोण उचलत आहे. ते म्हणाले कोण पेमेंट करतंय हे महत्त्वाचं आहे मात्र जास्त गरजेचं हे आहे कोणीतरी याचा खर्च उचलत आहे. टिकावू व्यवस्था निर्माण करण्यासाठी ती सामूहिक असो किंवा वैयक्तिक रुपात असो कोणाला ना कोणाला तरी खर्च करावा लागत असतो. सरकार यासाठी सब्सिडी देत आहे.
संजय म्हलोत्रा यांनी हे देखील स्पष्ट केलं की यूपीआय पेमेंटसाठी लागणारं शुल्क यूजर्सकडून घेतलं जावं याची आवश्यकता नाही. मी कधीच म्हटलं नाही की याचा खर्च यूजर्सकडून घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सरकारच्या धोरणांनी ग्राहकांमध्ये यूपीआयच्या वापराला प्रोत्साहन देम्यात महत्त्वाची भूमिका बजावली आङे. गेल्या काही महिन्यात यूपीआयचे व्यवहार सातत्यानं वाढत आहेत, असं म्हटलं.
नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये यूपीआय व्यवहार 19.47 अब्ज झाले आहेत. किमतीच्या नुसार विचार केला हा तर याचं मूल्य 25.08 लाख कोटी रुपये होतं. तर, मे महिन्यात 25.14 लाख कोटींचे व्यवहार झाले होते.
दरम्यान, आरबीआयनं ऑगस्टचं पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 5.5 टक्के कायम ठेवला आहे. आरबीआयनं गेल्या तीन पतधोरण बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती.
आणखी वाचा