Dahihandi event in Worli, Devendra Fadnavis made a political statement hinting at big changes in BMC : राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत. अशाच एका कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी केलेल्या एका सूचक विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
दहीहंडी मंडळांचं केलं अभिनंदनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळीतील जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहीहंडी मंडळांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एका दहीहंडी मंडळाने ‘छावा’ सिनेमातील दृश्य साकारलं होतं, त्याचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.
मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचे ओएसडी, CM Devendra Fadnavis नी पोलिसांना बोलावून बाहेर काढलं | Sakal News ''लोणी जनतेपर्यंत पोहोचवायचंय''यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक सूचक राजकीय विधान केलं. ते म्हणाले, “यंदा महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लावली जाईल. त्या विकासाच्या हंडीतील जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
लोणी कोणी खाल्लं, सर्वांना माहितीदरम्यान, “इतकी वर्षं लोणी कुठे जात होतं?” असा प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रत्युत्तर दिलं, “इतकी वर्षं लोणी कुठे जात होतं, हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही फक्त माझ्या तोंडून हे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहात, पण जनतेला माहित आहे की लोणी कोणी खाल्लं.”
CM Devendra Fadnavis : पर्यायी बाजारपेठेचा शोध घ्या! आयातशुल्काचा फटका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन ''आमच्या सरकारने बंधनं हटवली''यापूर्वी दहीहंडी आणि गणेशोत्सवावर काही बंधनं घालण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्व बंधनं हटवली असून, आता राज्यात सण प्रचंड उत्साहात साजरे केले जात आहेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.