दावोस येथे देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोस (Davos) येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF) राज्यासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार, एमएमआरडीए आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक सामंजस्य करार (MoU) करण्यात आले.
या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि स्मार्ट सिटी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याने राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठा वेग मिळणार आहे.
– सुमितोमो रिअॅल्टी अँड डेव्हलपमेंट
गुंतवणूक: 8 अब्ज डॉलर | रोजगार: 80,000
– च्या. रहेजा कॉर्प
गुंतवणूक: 10 अब्ज डॉलर | रोजगार: 1,00,000
– अल्टा कॅपिटल / पंचशील रिअॅल्टी
गुंतवणूक: 25 अब्ज डॉलर | रोजगार: 2,50,000
– आयआयएसएम ग्लोबल
गुंतवणूक: 8 अब्ज डॉलर | रोजगार: 80,000
– JICA – धोरणात्मक भागीदार
– सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट (सिंगापूर) – कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या औद्योगिक उद्यानांसाठी ज्ञान भागीदार
– टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (जर्मनी) – शाश्वत शहरी वाहतूक प्रणालीसाठी सहकार्य
– अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह (लंडन) – मुंबईसाठी ‘डिजिटल ट्विन’ इकोसिस्टम विकसित करण्याचा उपक्रम
दावोसमध्ये राज्य सरकारने भारतीय कंपन्यांसोबतही महत्त्वाचे करार केले आहेत.
– लोढा डेव्हलपर्स लिमिटेड
गुंतवणूक: ₹1,00,000 कोटी | रोजगार: 1,50,000
क्षेत्र: IT / ITES – डेटा केंद्रे | प्रदेश: MMR
– योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.
गुंतवणूक: ₹4,000 कोटी | रोजगार: 6,000
क्षेत्र: अक्षय ऊर्जा | राज्य: पालघर/एमएमआर
– बीएफएन फोर्जिंग्ज
गुंतवणूक: ₹565 कोटी | रोजगार: 847
क्षेत्र: पोलाद | प्रदेश: पालघर / MMR
– सूरजागड इस्पात लिमिटेड
गुंतवणूक: ₹20,000 कोटी | रोजगार: 8,000
क्षेत्र: पोलाद | प्रदेश: गडचिरोली / विदर्भ
– एसबीजी ग्रुप (एमएमआरडीए)
गुंतवणूक: $20 अब्ज | रोजगार: 4,50,000
सेक्टर: लॉजिस्टिक | राज्य: मुंबई महानगर प्रदेश
दरम्यान, जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.
राज्यात सध्या ‘तिसरी मुंबई’ आकार घेत असून, या परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सुमारे 10 ते 12 विविध क्षेत्रांतील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत.
या क्लस्टरमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, असा महत्त्वपूर्ण अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी राज्याकडे उत्कृष्ट ‘मेन्यू कार्ड’ तयार असल्याचे त्यांनी मिश्किलपणे नमूद केले.
गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला आहे. हीच गती कायम राहिल्यास, 2032 ऐवजी 2030 पर्यंतच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
मेन इन ब्लॅक! मुंबई जिंकून देवेंद्र फडणवीस ठरल्याप्रमाणे ‘त्या’ कामगिरीवर निघाले