पालघरमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन
पालघर (बातमीदार) : कौशल्य प्राप्त केल्यास तरुणांना रोजगार मिळवणे अवघड नाही, असे विचार सीआयआयच्या कांदिवली येथील सेंटरचे प्रमुख दयाळ कांगणे यांनी व्यक्त केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ३१) महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ व पालघर परिसरातील इतर तरुणांनी सहभाग नोंदवला. जवळपास १७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या महारोजगार मेळाव्यासाठी आपली नोंदणी केली. या महारोजगार मेळाव्यामध्ये ३० कंपन्यांनी, तर ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १२४ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवडण्यात करण्यात आली. तसेच ३६७ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली व १३७ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्याचा सल्ला देण्यात आला.