आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी कंबर कसली आहे. या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाही ऑलराउंडर अक्षर पटेल हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने गेल्या 18 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे दिल्लीचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला होता. त्यामुळे यंदा दिल्लीची गेल्या मोसमातील चूक सुधारून जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याआधी कर्णधार अक्षरने बीसीसीआयच्या एका नियमाविरुद्ध प्रश्न उपस्थित करत जाहीर नाराजी व्यक्त केली. अक्षरने इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अक्षरने त्याला इम्पॅक्ट प्लेअर नियम पटत नसल्याचं म्हटलं.
आयपीएल स्पर्धेत गेल्या 2 मोसमांपासून इम्पॅक्ट प्लेअर नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. यंदाही हा नियम असणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे संघांना सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार कोणत्या खेळाडूला कधी पाठवायचं याचं स्वतंत्र मिळालं. मात्र या नियमामुळे ऑलराउंडर खेळाडूंचं महत्त्व कमी झालं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गेल्या 2 मोसमात फलंदाज आणि गोलंदाजांनाच सर्वाधिक संधी मिळाली आहे. त्यामुळे ऑलराउंडरचं महत्त्व कमी झालंय. अक्षरने नेमका याच मुद्द्याला हात घालत पत्रकार परिषदेत इम्पॅक्ट प्लेअर नियमावरुन भाष्य केलं.
इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत खेळाडूंमध्ये मतमतांतरे आहेत. अक्षर पटेल यानेही आपलं मत ठेवलं. अक्षरने ऑलराउंडर म्हणून या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली. “मला हा नियम पटत नाही कारण मी स्वत: ऑलराउंडर आहे. आधी ऑलराउंडरला प्राधान्य दिलं जायचं. मात्र या नियमामुळे टीम मॅनेजमेंटकडून फलंदाज किंवा गोलंदाजाची निवड केली जात आहे”, असं अक्षरने म्हटलं.
“मी पण ऑलराउंडर…”
“मी पण ऑलराउडंर आहे. याच कारणामुळे मला हा नियम पटत नाही. मात्र खेळाडू म्हणून नियम मान्य करावा लागणार. मात्र मला वैयक्तिरित्या हा नियम मला पटलेला नाही”, असं अक्षरने म्हटलं.
दरम्यान ‘इमपॅक्ट प्लेअर’ या नियमाची 2024 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून या इमपॅक्ट प्लेअर नियमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. या नियमाला रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज अनुभवी फलंदाजांनाही विरोध दर्शवला आहे.