Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
Tv9 Marathi March 29, 2026 10:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मित्र कसा असावा? मित्र कसा नसावा? आपला सर्वात जवळचा मित्र कोणता आणि केवळ आपल्यासोबत मैत्रीचं नाटक करणारी व्यक्ती कशी ओळखवावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नवाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या सर्वात जवळच्या मित्र आहेत. तुमच्या आयुष्यात काहीही झालं, सर्व जगाने जरी तुमची साथ सोडली तरी या गोष्टी तुमची आयुष्यात कधीही साथ सोडत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात विद्या अर्थात शिक्षण हे माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. कारण जर संपूर्ण जगाने जरी तुमची साथ सोडली आणि तुमच्याकडे उत्तम प्रकारचं शिक्षण असेल, तुम्ही उच्चशिक्षित असाल तर या जगात तुमचा कोणीही पराभव करू शकत नाही. जर तुम्ही शिकलेले असाल तर तुमच्या आयुष्यात अडचणी येणारच नाहीत, आणि जर समजा तुमच्या आयुष्यात अडचणी आल्याच तर तुम्ही त्यावर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या जोरावर मात करू शकता. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे, जी तुमची आयुष्यभर साथ सोडत नाही.

पत्नी – चाणक्य म्हणतात कोणत्याही माणसाची जर सर्वात जवळची मैत्रीण कोणी असेल तर ती म्हणजे त्याची पत्नी असते. पत्नी आपल्या पतीला त्याच्या प्रत्येक सुखा दु:खाच्या क्षणी साथ देते. पतीला पत्नीचा मोठा आधार असतो.

औषधी – चाणक्य म्हणतात औषध ही देखील एक अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात जवळचा मित्र असते, कारण औषधांमध्ये तुम्हाला आजारपणातून बर करण्याची ताकद असते.

धर्म – चाणक्य म्हणतात धर्म हा मरेपर्यंत माणसाची साथ सोडत नाही, त्यामुळे धर्म देखील माणसाचा सर्वात जवळचा मित्र असतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.