IPL 2026 स्पर्धेत आरसीबी विरुद्ध सीएसके सामना फक्त एकदाच का? जाणून घ्या त्या मागची कारणं
GH News April 06, 2026 10:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर वाढत चालली आहे. दहा संघांमध्ये टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची चुरस निर्माण झाली आहे. काही संघांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची सुरूवात निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने आणि तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभूत केलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पहिल्या विजयासाठी चेन्नई सुपर किंग्सला किती वाट पाहावी लागणार? याबाबत क्रीडाप्रेमी चर्चा करत आहेत. त्यात आरसीबीकडून पराभव झाल्याने चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पराभवाचा वचपा दुसऱ्या सामन्यात काढावा अशी भावना आहे. पण असं होणं या स्पर्धेत तरी कठीण आहे. कारण या स्पर्धेच्या साखळी फेरीत हे दोन्ही संघ एकदाच भिडणार आहेत. ...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.