मुंबई : बीएमसीने माहीम आणि वांद्रे दरम्यान १.३ किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्याची योजना तयार केली आहे, ज्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि माहीम कॉजवेवरील वाहतूक कोंडी कमी होईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २२० कोटी रुपये आहे. हा उड्डाणपूल मिठी नदीवरून जाईल आणि त्यामुळे उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवरील प्रवासाचा वेळ अंदाजे २०-२५ मिनिटांनी कमी होण्यास मदत होईल.
सध्या, वांद्रेच्या पश्चिम बाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त दोन उत्तर-दक्षिण मार्ग उपलब्ध आहेत. या मार्गांवर अनेकदा प्रचंड वाहतूक कोंडी होते . या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, बीएमसी तिसरा जोडणी मार्ग बांधण्याच्या योजनेवर काम करत आहे. हा प्रकल्प सर्वप्रथम २०२२ मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु दोन निविदा प्रक्रिया पार पाडूनही कंत्राटदारांच्या कमतरतेमुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही.
Mumbai: मुंबईकरांना दिलासा, १३ वर्षांनंतर पुनर्विकास प्रकल्प सुरू होणार; न्यायालयाकडून हिरवा कंदीलआता, बीएमसीने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या असून, यावेळी या प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे. सुमारे १ ते १.५ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल माहीममधील सेनापती बापट मार्गाला वांद्रे पूर्वेकडील कलानगर उड्डाणपुलाशी जोडेल. हा पूल मिठी नदीवरून जाणार असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
माहीम आणि वांद्रे दरम्यानच्या या मार्गावर बऱ्याच काळापासून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे, विशेषतः गर्दीच्या वेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या उड्डाणपुलामुळे माहीम, वांद्रे, दादर, खार आणि सांताक्रूझ यांसारख्या भागांमधील वाहतूक सुरळीत होईल. अधिकाऱ्यांच्या मते, या मार्गावरील प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होऊ शकतो. या उड्डाणपुलामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस.व्ही. रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक यांना असलेली कनेक्टिव्हिटीसुद्धा सुधारेल.
ST Bus: आपली बस आपली सेवा! एसटीचा प्रवास आणखी सुखकर होणार, प्रवाशांना मदतीचा हात; महामंडळाच्या नव्या उपक्रमाची घोषणा