Solar Eclipse : 2 ऑगस्ट 2027 ला लागणं सूर्यग्रहण हे खगोलशास्त्राच्या जगातील एक अतिशय खास घटना मानली जात आहे. या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतील आणि काही क्षणांसाठी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल. म्हणूनच हे 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण सूर्यग्रहणांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, याचा कालावधी अंदाजे 6 मिनिटे आणि 23 सेकंद असण्याची शक्यता आहे, सर्वसाधारण ग्रहणांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त काळ आहे.
कधी, किती वेळ असेल सूर्यग्रहण ?
पंचांगानुसार, 2027 सालचं हे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट रोजी होणार असून, त्याचा एकूण कालावधी अंदाजे 6 मिनिटं आणि 23 सेकंद असेल. सामान्यतः खग्रास सूर्यग्रहण फक्त 2 ते 3 मिनिटं टिकते, परंतु हा वाढलेला कालावधी या शतकातील सर्वात मोठा मानला जात आहे.
कोणत्या देशात दिसणार ग्रहण ?
हे दुर्मिळ सूर्यग्रहण भारतात खंडग्रास स्वरूपात दिसेल, परंतु इजिप्त (लक्सर), सौदी अरेबिया (मक्का/जेद्दाह), येमेन, स्पेन, मोरोक्को आणि लिबियासह जगातील अनेक भागांमध्ये ते पूर्णपणे दिसेल. या भागांमध्ये दिवसा काही मिनिटांसाठी अंधार पडू शकतो, ज्यामुळे एक अनोखा अनुभव मिळेल. शास्त्रज्ञांनुसार, 1991 के 2114 दरम्यानचे हे सर्वात लांब खग्रास सूर्यग्रहण असेल. त्याचा दीर्घ कालावधी आणि ही एक दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना असल्यामुळे ते विशेष ठरतं. म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रप्रेमी या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सूर्य ग्रहण म्हणजे काय ?
सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून, हे तेव्हा घडतं जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो आणि त्यामुळे सूर्यप्रकाश अंशतः किंवा पूर्णपणे झाकतो. जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जातो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात आणि जेव्हा फक्त मध्यभाग झाकला जातो व कडांभोवती प्रकाशाची एक वलय दिसते, तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
कशी घ्यावी काळजी ?
सूर्यग्रहण ही एक महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ते पाहताना व पाहिल्यानंतर काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, संरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्याकडे पाहू नका, कारण त्याच्या तीव्र किरणांमुळे दृष्टीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. तसंच, ग्रहणाच्या वेळी स्वयंपाक न करण्याची किंवा अन्न न खाण्याची परंपरा पाळली जाते, कारण असा मानलं जात की, या वेळी वातावरणातील जंतूंची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)