दक्षिण मुंबईतील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास गुंतागुंतीचा झाला आहे. फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (FSL) हे स्पष्ट केले की मृत्यू कलिंगडातील झिंक फॉस्फाईड म्हणजे उंदीर मारण्याच्या औषधाने झाला आहे.,परंतू सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे विष कलिंगडात कसे पोहचले ? हे कळल्याचा मार्ग पोलिसांना सापडलेला नाही.
ताज्या घडामोडीनुसार पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील घराच्या तपासणीत पोलिसांना उंदीर मारण्याची एक हर्बल औषधाची बाटली सापडली आहे. सुरुवातीच्या तपासात उघडकीस आले की या हर्बल बाटलीत झिंक फॉस्फाईड सापडलेले नाही. घरात जर हर्बल औषध सापडले असेल तर फळ आणि मृतांच्या व्हीसेरात उंदीर मारण्याचे केमिकल कोठून आले.
पोलिस आता या तपासात अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. या कुटुंबावर कोणतेही मोठे कर्ज नव्हते. त्यांचा खानदानी दुकान होते. ज्यातून मिळणाऱ्या भाड्यात त्यांचा घराचा खर्चा आणि चाळीचा खर्च निघत होता. पोलिसांना आतापर्यंत हत्या किंवा कोणत्या कटकारस्थानाचा पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळालेली नाही. तर कुटुंबाची कोणाशी दुश्मनी असल्याचेही पुढे आलेले नाहीय
नेमकी घटना काय ?२६ एप्रिलच्या रात्री अब्दुल डोकडिया ( ४४), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली आयशा (१६) आणि जैनब (१३ ) यांनी चिकन बिर्याणी खाल्ल्यानंतर काही वेळाने कलिंगड खाल्ले होते. रात्री त्यांना फूड पॉझजनिंग झाले. डॉक्टरांनी औषधे दिली मात्र तरीही तब्येत बिघडत गेली. एका मुलीला रुग्णालयात मृत घोषीत केले. तर उर्वरित तिघांचा मृत्यू जे.जे.रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिस आता काय करणार ?मृतांच्या लिव्हर, किडनी आणि स्वादुपिंडात झिंक फॉस्फाईड सापडले आहे. उरलेल्या कलिंगडाच्या नमुन्यातही ते सापडले आहे. चिकन बिर्याणीत कोणतेही विषारी घटक सापडले नाहीत. मुंबई पोलिस आता या प्रकरणात फोरेन्सिक तज्ज्ञांशी पुन्हा सल्लामसलत करणार आहेत. आता कलिंगड खरेदी करताना किंवा बाजारात यात कलिंगडात कोणी विष मिसळले का ? वा घरात कोणाकडून अजाणतेपणी किंवा अन्य प्रकारे हे विष जेवणात मिक्स केले असेल का ? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.