राज्यात सरकार कोणाचेही असो, ते आपले असो की परके, आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शिवसेनेचा डीएनए हा आंदोलनाचा आहे,असा आक्रमक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. शिवसेना-प्रहार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.आपल्या भाषणात आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी नुकताच गोंदिया दौऱ्यावरून आलो असून तिथे अजूनही धानाची खरेदी पूर्ण झालेली नाही, अर्ध्याहून अधिक धान खरेदी विना पडून आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
पवन मावळात काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.पवन मावळातील वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेला उजाळा देणारा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येळसे येथे कॉलेजच्या किर्तनाने मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण पवन मावळ वारकरी समाज आणि भाविक भक्तांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित या सप्ताहात पहाटेच्या काकडा भजनापासून ते रात्रीच्या हरि जागरापर्यंत अखंड नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचने, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळाला. यात पवन मावळातील विविध गावांच्या सहकार्याने आयोजित हा भक्तीमय उत्सव पार पडला.