टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव कराव केला आहे. टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर असल्याने दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर बांगलादेशसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. अशात बांग्लादेशला मोठा झटका लागला आहे. स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्यानंतर आता महमदुल्लाह याने निवृत्ती जाहीर करत बांगलादेशला मोठा झटका दिला आहे. महमदुल्लाह याने दुसऱ्या टी 20i सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत निवृत्तीबाबतचा आपला निर्णय जाहीर केला.