दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात टीम इंडियाने आपल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 90 धावांवर बाद झाला. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषकातील दुसरा विजय साजरा केला.