Maharashtra Live Update: भंडाऱ्यात १७ हजार लाडक्या बहिणी झाल्यात अपात्र, विविध कारणांनी प्रस्ताव केले रद्द
Saam TV March 10, 2025 06:45 PM
Pune: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी दहशतीचे माहेरघर झाले आहे.

पोर्शे कार अपघात,कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत.

छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत,अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.

या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिले नाही.

याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार..

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन

Lasalgaon : कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन

लासलगाव बाजार समितीत प्रहरचे गणेश निंबाळकर,गोरख संत सह कार्यकर्त्यानी केले आंदोलन

लासलगाव बाजार समितीच्या आवारात घोषणा देत लिलाव पडले बंद

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त

कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची केली मागणी

लिलाव बंद पाडत आंदोलकांनी बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले सुरू

Dombivali: डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक

काल रात्रीच्या सुमारास सुमारास लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून झाली दगडफेक,..... सुदैवाने कोणतीही जखमी नाही.

ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची वीर सावरकर शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून सुरू होती शाखा

दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

गहु काढणीला सुरूवात, बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत मोठी घसरण

नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहु पिकांच्या काढणीला सुरूवात झाली. रब्बीतील सर्व पिकांना जीवदान मिळाले.

मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे.

कारण काढणीपर्यंत गव्हाला जिल्ह्यात उच्चांकी दर होता मात्र, रब्बी हंगामातील गहू बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होताच 3 हजार 500 रुपये क्विंटलवर गेलेला गहू थेट 3 हजार ते 2 हजार 500 वर येऊन ठेपला आहे.

त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर याप्रमाणेच गव्हाचीही साठवणूक की विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

Hingoli: हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार

सलग तीन वेळा काँग्रेस कडून हिंगोली विधानसभेत विजयी झालेले काँग्रेस नेते भाऊराव पाटील गोरेगावकर हजारो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेने प्रवेश करणार

2024 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने गोरेगावकर यांनी बंडखोरी करत लक्षेवधी मते घेतली होती मात्र पराभव झाल्याने आता आगामी निवडणुकांची तयारी म्हणून पक्षप्रवेश होणार

Nanded: हदगाव तालुक्यातील बळीराजाच्या चिंतेत भर, शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान

नांदेडच्या हदगाव तालुक्यात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांनी कांदा, मका व फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

वनविभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा द्यावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रानडुकरे शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्लेसुद्धा होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

भारताच्या विजयाचा जल्लोष दुबईतही वाजला श्रीमंत ढोल ताशा पथकाचा ढोल

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत संपूर्ण देशाला अभिमानास्पद क्षण दिलले आहे या ऐतिहासिक विजयाचा आनंद सर्व देशभरात साजरा केला जात असताना

श्रीमंत ढोल ताशा पथकाने दुबईतील स्टेडियमबाहेर दमदार वादन करत क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात अधिक रंग भरले.

भारताच्या विजयाने भारावलेल्या दुबईत असलेल्या हजारो चाहत्यांनी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुबई भारतमय झाला होता . उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी आनंदाने नृत्य केले, झेंडे फडकवत भारताचा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला.

या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाचा हृदयस्पर्श केला. अनेक माध्यम प्रतिनिधींनी आणि सोशल मीडियावरील चाहत्यांनी या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडिओ शेअर केले, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

श्रीमंत ढोल ताशा पथक हे केवळ एक वादन पथक नसून, भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरवशाली प्रचार करत आहे.

Bhandara: भंडाऱ्यात १७ हजार लाडक्या बहिणी झाल्यात अपात्र, विविध कारणांनी प्रस्ताव केले रद्द

विधानसभा निवडणुकीपूर्वी पात्र ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भंडारा जिल्ह्यातील १७ हजार १८३ लाडक्या बहिणींना विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आलं आहे.

तालुकास्तरीय समितींच्या तपासणीत लाडक्या बहिणींचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर, भंडारा जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ७८८ महिलांचे प्रस्ताव या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्ह्यातील १४ महिलांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. अपात्र ठरलेल्या महिलांकडून अगोदर दिलेले रक्कम परत घेणार नाही.

मात्र, पुढील लाभासाठी त्या आता वंचित झाल्या आहेत.

अमरावती शहरातील पोलीस स्टेशन मधील भंगार दुचाकींचा लागणारा आता कायम विल्हेवाट

कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा निर्णय..

500 भंगार दुचाकी पोलीस मुख्यालयात आणल्या.. उर्वरित भंगार दुचाकी आणण्याचे काम सुरू.

दुचाकी मालकांसोबत पोलिसांचा संपर्क सुरू,महिना भराची दिली मुदत..

महिनाभरात मूळ मालकांनी दुचाकी न नेल्यास दुचाकीचा करणार लिलाव..

Maharashtra Live Update: पुण्यात काँग्रेसला खिंडार, रवींद्र धंगेकरांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत.

शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली.

आज प्रवेश करणार आहे. सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे.

आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार आहे.

कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

अमरावती बाजार समितीत दररोज 1 हजार कॅरेट सत्राची विक्री, 600 ते 1000 रुपये बाजारभाव

आपल्या आंबट गोड चवीसाठी विदर्भातील संत्र्याची ओळख आहे..

अमरावतीमध्ये सर्वात जास्त उत्पादन संत्राचे घेतल जाते..

मृग बहारात निघालेला संत्रा आता बाजारात येऊ लागला असून अमरावती बाजार समितीमध्ये दररोज एक हजार कॅरेट संत्र्याची आवक आहे..

बाजार समितीमध्ये संत्र्याला सहाशे रुपये पासून तर 1 हजार रुपये प्रति कॅरेट पर्यंत भाव मिळतोय..

यावर्षी संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने उत्पादनात घट झाली असली तरी साधारणतः संत्राला बाजार भाव व्यवस्थित रित्या मिळतोय..

सुरुवातीपासूनच संत्र्याचे भाव स्थिर राहिले आहेत..

हळूहळू अमरावती बाजार समितीमध्ये संत्र्याची आवक वाढणार असल्याची माहिती फळ विक्रेता व्यवसायिकांनी दिली..

Maharashtra Live Update: बीड सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर

शिरूरच्या सतीश उर्फ खोक्या भोसले चे केलेल्या कारनाम्यांचे नवनवीन व्हिडिओ समोर कधी मुलांना धमकी दिल्याचे तर कधी पैसे उधळताना तर कधी मारहाणीचे या व्हिडिओमुळे सतीश भोसले सध्याला चर्चे मध्ये आहे.

अशातच या सतीश भोसले चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

त्यामध्ये तो चालत असताना दोन्ही बाजूला रिवाल्वर हातामध्ये असलेले दोन व्यक्ती चालतात आणि सतीश भोसलेमध्ये चालतो.

या व्हिडिओमध्ये रिवाल्वर कशामुळे वापरल्या आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल करून आपली दहशत पसरवण्याचं काम सतीश भेटले त्यामध्ये गाणं बनवण्यात आले आहे की पुरा आसमान मुठठी मे करना है येतो सुरुवात है असे गाणे टाकून तो रिल्स आपल्या इंस्टाग्राम टाकतो आणि दहशत पसरवत अशी चर्चा या परिसरामध्ये आहे.

Maharashtra Politics: गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचे वाटोळे केलंय, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापला आहे,

आता त्यांचा डोळा आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यावर आणि कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्यावर आहे,

केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील जिल्ह्यातील सहकारी आणि सभासदांचे कारखाने हडप करत आहेत, असा आरोप देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

भंडाऱ्यात २२ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, कारधा पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी असतानाही राष्ट्रीय महामार्गावरून सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असताना भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी २२ लाखांचा सुगंधित तंबाखू पकडला.

पान पराग कंपनीचा हा सुगंधित तंबाखूसाठा रायपूर येथून भंडाराकडं एका आयशर ट्रक (CG 08 AR 6050) मधून येत असल्याची माहिती कारधा पोलिसांना मिळाली.

यावरून कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून हा आयशर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला.

याप्रकरणी कारधा पोलिसांनी चालक बलराम रीचोलिया (४०) रा. इंदोर आणि क्लिनर दिनेश गुजरिया (३०) रा इंदोर या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

या कारवाईत कारधा पोलिसांनी २२ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि आयशर ट्रक असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वर्षाची कारधा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

छत्रपती मालोजीराजे यांच्याकडून श्रीतुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कोल्हापूरच्या छत्रपती राजघराण्यातील युवराज छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटूंब अभिषेक महापूजा केली.

रूढी परंपरेप्रमाणे तुळजाभवानी देवीच्या गर्भग्रहामध्ये जाऊन छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली,

तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीची ओटी भरली.

अभिषेक महापूजेच्या वेळी मालोजीराजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने श्रीतुळजाभवानी देवींची प्रतिमा,कवड्याची माळ व महावस्त्र देऊन रूढी परंपरेप्रमाणे छत्रपती घराण्यातील सदस्यांच सन्मान करण्यात आला.

Ratnagiri: रत्नागिरीमध्ये नवीन एसटी बस दाखल

रत्नागिरी एसटी आगारातून नवीन एसटी बसचे लोकार्पण कार्यक्रम राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा, राजापूर, देवरूख, रत्नागिरी या डेपोंना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत.

त्यापैकी लांजा दोन, राजापूर पाच, रत्नागिरी दहा अशा 17 बसेस प्राप्त झाल्या असून याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः या बस मधून प्रवास केला व प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Jalna: जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसाची वनकोठडी

जालन्यात खवले मांजरीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्याच अधिकाऱ्यांनी व्यापारी होत सापळारचून जालन्यातील मंठा चौफुली परिसरात कारवाई केली होती.

या कारवाईमध्ये तीन वाहनांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

दरम्यान या खवल्या मांजरीचा वापर कश्यासाठी करायचा होता याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Raigad: भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रायगडमध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष

भारतीय संघाने न्यूझीलंड विरूध्द क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

या विजयाचा जोरदार जल्लोष रायगडमध्ये साजरा करण्यात आला.

महाड शहरातील छ. शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा भगवे झेंडे फडकवत त्याच बरोबर फटाकांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.

Ambernath: अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

अंबरनाथमधील सराईत गुन्हेगार फहाद उमर इंजिनिअर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याची वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये.

त्याच्यावर २० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यानं एक वर्षासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.