Maharashtra News Live Updates: प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगडावरील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश
Saam TV April 06, 2025 03:45 PM
Pune Accident: पुण्यात टँकर खाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

टँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने घडला अपघात

पुण्यातील वारजे परिसरातील घटना

टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

वारजे पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल

टँकर चालकाला पोलिसांनी केली अटक

वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणपती माथा परिसरात काल रात्री घडली घटना

टँकर चालकावर वारजे पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Nashik: नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात श्रीराम जन्म उत्सवाला सुरवात

12 वाजता पाळणा हलवून श्री रामाचा जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

एपीएमसी फळबाजारात राज्यासह परराज्यातून आंब्याची मोठी आवक, 80 हजार पेक्षा अधिक पेट्या दाखल

फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झालेय.

एपीएमसी फळ बाजारात राज्यभरातून 64184 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या असून परराज्यातून 16740 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्यात.

एकूण 80 हजाराच्या वर आंब्याच्या पेट्या या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्याने आंब्याचा दर 1200 रुपये ते 5000 रुपये प्रति पेटी इतका घसरलेला पहायला मिळत असून आंबा आता सर्वासामान्य ग्राहकांना परवडेल या भावात मिळू लागलाय.

10 मे पर्यंत आंब्याचा हंगाम अशाच प्रकारे सुरू राहणार असून आंबे खवय्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.

रामनवमी निमित्ताने नवापूर शहरातून निघाली महिलांची मोटरसायकल रॅली

रामनवमी निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातून महिलांनी मोटार सायकल रॅली काढत रामनवमीचा पर्व उत्साहात साजरी केला आहे.

नवापूर शहरातील दत्त मंदीरापासून यामहिलांच्या बाईक रॅलीला सुरवात झाली होती.

शिवाजी रोड, लिमंडावाडीस, लाईटबाजारातून श्रीराम मंदीरात या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.

मोटार सायकल रँलीमध्ये महिला भगवा फेटा बाधुन जयश्रीरामचा जयघोष करत मोटार सायकल रँली मध्ये मोठया उत्सहात सहभागी झाल्या होत्या.

या नंतर महिलानी श्रीराम मंदीरा जवळ गरबा नृत्यृ सादर करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगडावरील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश

आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली बैठक.....

दिव्यांग व शेतकरी शेतमजुरांच्या विविध प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी रायगडावर केले होते अन्न त्या आंदोलन....

यामध्ये दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,दिव्यांगांची कर्जमाफी करावी, पेरणी ते कापणी पर्यंतची कामे MREGS अंतर्गत करण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, यासह अनेक मागण्या बच्चू कडूंनी सरकारकडे केल्या होत्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक लावून तुमचे मुद्दे निकाली काढू असे दूरध्वनीवरून दिले होते आश्वासन, त्यानंतर  बच्चू कडू यांनी आपले उपोषण घेतले होते मागे....

सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीसाठी सर्व विभागातील सचिव राहणार उपस्थित.....

Latur: लातूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

लातूरचा निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन केल आहे...

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे..

यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत ,पुतळ्याचे दहन केलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोहरादेवी दौऱ्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचं राजू शेट्टी यांनी केलं होतं शेतकऱ्यांना आवाहन.

स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाशिम पोलिसांनी घेतले ताब्यात.

पोलिसांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कालच बजावली होती नोटीस.

पोलिसांकडू दडपशाही केली जात असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप.

जून नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात कामांचा पाऊस पडेल; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुश्किल टिप्पणी

यंदाच्या अर्थ संकल्पात फारसं काही घेता आलं नाही पण जून नंतर रस्ते,पूल अशा कामांचा पाऊस पडेल, अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

मंत्री भोसले हे काल पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

लाडकी बहिण योजनेमुळे सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावली आहे. त्याचा फटका सार्वजनिक बांधकाम विभगागाला ही बसल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.

अनेकांना वाटते आपला मित्र सार्वजनिक बांधकाम मंत्री झाला आहे. काम मिळतील पण यावर्षी फारसं काही मिळालं नाही. जून नंतर मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यात सर्वत्र कामांचा पाऊस पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Karjat: कर्जत येथे राम मुर्तीच होणार लोकार्पण

० कर्जत येथील दहिवली गणेश घाट येथे भव्य अशी राम मुर्ती उभारण्यात आली आहे

० सकाळपासून या ठिकाणी विधीवत पुजा, होम हवन सुरू झाले आहे

० संध्याकाळी भव्य अशा सोहळ्यात राम मुर्तीच होणार लोकार्पण

० आ. महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, 1008 मंडलेश्वर महामहंत चंद्रदेवासजी महाराज हे उपस्थित रहाणार आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीत विविध विकास कामांची पाहणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे.

आज सकाळपासूनच अजित पवारांनी शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांना भेटी दिल्या आहेत आणि ही विकास कामे दर्जेदार व्हावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

भुम तालुक्यातील वंजारवाडी येथे विज वितरणच्या डीपीचा करंट लागुन युवकाचा मृत्यू

धाराशिव च्या भुम तालुक्यातील वंजारवाडी येथे विद्युत वितरण कंपनीच्या डिपीचा करंट लागुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बालाजी भालचंद्र जगदाळे अस या युवकाच नाव असुन तो लाईनमन च्या हाताखाली काम करायचा.

सदरील युवक डिपीची दुरुस्ती करण्यासाठी गेला असता लाईट बंद न केल्याने करंट लागुन मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय

तर याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेह भुम महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता दरम्यान याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेवुन व अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nanded: रामनवमीनिमित्त नांदेड शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात.

रामनवमीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणूक निघणार आहे.

श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या दरम्यान शहरात या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस दलाने घेतली आहे.

शहरात पोलिसांचा मोठा फौफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, 31 पोलीस निरीक्षकांसह 1200 पोलीस कर्मचारी तसेच 1100 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्यासह मोठा पोलीस बंदोबस्त नांदेड शहरात लावण्यात आला आहे.

सकाळ पासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्ता सोबतच इतरही उपाय योजना करण्यात आल्या आहेत

Maharashtra Live Updates: विश्रांतवाडीमध्ये काँग्रेसचे भिक मांगो आंदोलन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय, हलगर्जीपणाची, उन्मादातून घडलेली असल्याचे स्पष्टपणे दिसते.

या रुग्णालयाला धर्मादाय हेतूसाठी केवळ एक रुपयाच्या दराने मिळालेली जमीन, त्या बदल्यात नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा काय? हा प्रश्न आता सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा आणि हक्काचा आहे.

काँग्रेसच्या वतीने विश्रांतवाडी येथे भिक मांगो आंदोलन करण्यात आले आणि खालील मागण्या शासनाकडे मांडण्यात आल्या धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल सादर करावा चौकशी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाची जबाबदारी शासनाने तात्पुरती आपल्या अखत्यारीत घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

Dharashiv: धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत

धाराशिव जिल्ह्यात आज जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे मतदान काल पार पडले. जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडली असून आहे.

मजूर फॅडरेशनचे जिल्ह्यात एकूण 343 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

आज याचा निकाल लागणार असून मजूर फेडरेशनवर महाविकास आघाडी की महायुती याचा फैसला होणार आहे.

13 पैकी चार जागा या यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून बाकी नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच वर्चस्व या मजूर फेडरेशन वरती राहीलेले आहे.

Nanded: नांदेड जिल्ह्यातील विहिरींचे होणार सर्वेक्षण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले आदेश

नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनेनंतर कठडे नसलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर जिल्ह्यात दुसरी घटना घडू नये यासाठी आपत्कालीन उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व धोकादायक तसेच कठले नसलेल्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

यात प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींच्या नोंदी घेऊन अहवाल सादर करावेत अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

आलेगावच्या घटनेमध्ये सात निष्पाप शेत मजूर महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला.

त्यामुळे अशा धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी कर्डिले यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्याआहेत.

उमरगा येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध बालाजी देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात

धाराशिवच्या उमरगा शहरातील मुळज रोड लगतच्या बालाजी मंदिर देवस्थानच्या याञेला शनिवार पासुन प्रारंभ झालाय दरम्यान याञेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात.शहरातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.शहरातील जुनीपेठ,महादेव मंदिर,गणपती मंदिरापासून महामार्गावरून ढोल,बँजो हलगी व डॉल्बीच्या तालावर नागरिकांनी जल्लोष केला.मिरवणुकीनंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.

Nashik: रामनवमी निमित्त श्री काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटे झालेल्या काकडा आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे... आज बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरात पार पडणार असून यापूर्वी प्रभू श्रीरामा सह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून अभूषणा चढवली जात आहेत..

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे..

रात्री त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी रिवाल्वर मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे..

तर यात आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे..

मात्र आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही

तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार ११ एप्रिल रोजी पहाटे भाविकांसाठी होणार बंद

तुळजाभवानी मातेच्या चैञ याञेच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे.

याञा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरुन मंदीरात सोडण्यात येणार आहे.

दरम्यान १२ एप्रिल रोजी मंदीरात पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.तुळजाभवानी मातेची चैत्र पोर्णिमा याञा ११ ते १५ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे.

याञेत राज्यासह आंध्र प्रदेश,कर्नाटक व तेलंगनातील भाविक वर्षाचा खेटा पुर्ण करण्यासाठी येतात याञा कालावधीत भाविकांना सुलभ दर्शनासाठी ११ ते १५ एप्रिल दरम्यान बिडकर पायऱ्यांवरुन मंदीरात सोडण्यात येणार आहे अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यमंत्री योगेश यांनी ताफा थांबवून अपघात ग्रस्त व्यक्तीची केली मदत

गृहराज्यमंत्री खेड दापोली महामार्ग ने जात असताना रोड च्या कडेवर गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीला बघून नामदार योगेश कदम यांनी आपला ताफा थांबवला व घटनेची माहिती घेतली माहिती घेता च गंभीर जखमी असलेल्या अज्ञात व्यक्तीला लगेच मदत करत आपल्या गाडीमधून रुग्णालयात दाखल केले.. गावकऱ्यांकडून माहिती घेता अपघात झाल्या चे समोर आले या अपघातात अमरनाथ दयाळकर हा गंभीर झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत

सकाळ मध्यम समूह व साम टीव्हीच्या वतीने अमरावतीमध्ये गीत रामायण, हजारो श्रोत्यांची उपस्थिती

आज रामनवमी, सकाळ मध्यम समूह व साम टीव्हीच्या वतिने अमरावती मध्ये पहाटे रामनवमी निमित्य गीतरामायनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाकवी माडगूळकर विरचित गीतरामायण यावेळी सादर करण्यात आले.

यावेळी खासदार बळवंत वानखडे,आ.सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस विधांन परिषदेचे आमदार संजय खोडके, यांच्या सह अमरावती शहरातील हजारो श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी गीत रामायणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.हे सकाळ मध्यम समूह तर्फे आयोजित गीत रामायणाचे हे 17 वे वर्ष आहे.

पेडगाव येथील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची मागणी

अहिल्या नगर येथील पेडगाव येथील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभा करावे व अखंड ज्योत प्रज्वलित करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर व सुनील नागणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सरकार या बाबत सकारात्मक विचार करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले आहे.

दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त.

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या..

चोरीच्या 3 मोटार सायकली आणि 2 मालवाहू वाहने असा एकत्रित 7 लाख 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय..

शेख ईरशाद शेख आजम याने अकोला जिल्ह्यात आणि ईतर ठीकाणी मोटार सायकली आणि मालवाहु गाडीची चोरी केली होती..

या माहीती वरून पथकाने त्याच्या साथीदारासह त्याला ताब्यात घेतले..

दोघांनी दुचाकी व चारचाकी मालवाहू वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याचे हा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय..

बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, जुने शहर आणि कारंजा लाड मधून या दोघांनी हे सर्व दुचाकी आणि वाहने चोरी केले होते..

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे..

रात्री त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानी रिवाल्वर मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे.. तर यात आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे..

मात्र आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही....

सांगोल्याच्या किडे बिसरीच्या शाळेत मुलींच्या शौचालयाची दुरावस्था

सोलापूर आणि सांगली जिल्हाच्या सरहद्दीवर असलेल्या सांगोला तालुक्यातील किडेबिसरी येथील एका माध्यमिक शाळेत मुलींच्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे.

त्यामुळे शाळेतील मुलींची कुचंबणा होत आहे असा आरोप स्थानिक पालकांनी केला आहे.

येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत शाळा भरते.

शाळेच्या मालकीची इमारत नाही. भाड्याच्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीमध्ये शाळा भरवली जाते. शाळेला क्रीडांगण नाही.

शाळेत सीसीटीव्ही बसवले नाहीत. शौचालयाची दुरावस्था झाली आहे. मुख्याध्यपकाचे कार्यालही एका धाब्याच्या घरात सुरू आहे.

मुलींसाठी शाळेच्या आवारात चांगले शौचालय आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अन्यथा शाळा व्यवस्थापना विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

Ambernath: अंबरनाथमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं

अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे.

या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर आले.

त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला.

तसंच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

अवघ्या २३ सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.