इंग्लंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याचा चौथा दिवस केएल राहुल आणि रिषभ पंतने गाजवला आहे. दोघांनीही शानदार भागीदारी करत इंग्लंडला सातवलं असून भारताचे वर्चस्व निर्माण केले आहे.
या सामन्यात भारताला पहिल्या डावात केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसरा डाव महत्त्वाचा होता. पण भारतासाठी केएल राहुलनेशानदार शतक आणि रिषभ पंतने अर्धशतक करत भारताला मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचून दिला आहे.
IND vs ENG 1st Test: आता एका जागी बसून रडू तर शतक नाही ना? पाच विकेट्स घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह कोणावर संतापला?तिसऱ्या दिवस अखेर भारताने दुसऱ्या डावात २३.५ षटकात २ बाद ९० धावा केल्या होत्या. त्यावेळी केएल राहुल ४७ धावांवर,तर कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर नाबाद होते. चौथ्या दिवशी यापुढे भारताने खेळायला सुरुवात केली.
पण २५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शुभमनला ब्रायडन कार्सने ८ धावावंर त्रिफळाचीत केले. त्यावेळी ढगाळ वातावरण होते, त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज सतावणार की काय असं वाटत होतं. पण रिषभ पंतने केएल राहुलला भक्कम साथ दिली.
एक बाजू केएल राहुल संयमी खेळ करत सांभाळत होता, तर रिषभ आक्रमक फटके खेळत होता. यादरम्यान इंग्लंडला विकेट घेण्याच्या संधी मिळाल्या, पण त्या त्यांनी गमावल्या. त्याचा केएल राहुल आणि रिषभ या दोघांनीही फायदा घेतला आणि शतकी भागीदारीही झाली.
यादरम्यान, केएल राहुलने २०२ चेंडूत त्याचे नववे कसोटी शतक पूर्ण केले. केएल राहुलचे हे इंग्लंडमधील तिसरे शतक आहे. हे शतक ठोकल्यानंतर त्याने बॅट उंचावत सेलीब्रेशन केले. यावेळी भारताच्या ड्रेसिंग रुममध्येही इतर सदस्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले.
केएल राहुलने इंग्लंडमध्ये तिन्ही शतके सलामीला खेळताना केली आहेत. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये तीन शतके करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याने राहुल द्रविड, सुनील गावसकर, विजय मर्चंट आणि रवी शास्त्री यांना मागे टाकले आहे. या चौघांनीबी सलामीला खेळताना इंग्लंडमध्ये कसोटीत प्रत्येकी २ शतके केली आहेत.
IND vs ENG 1st Test : रिषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये येताच KL Rahul ने का जोडले हात? Viral Video मधून मिळतील सर्व उत्तरं रिषभची शतकाकडे वाटचालदरम्यान, रिषभ पंत देखील शतकाकडे वाटचाल करत असून ६३ षटकानंतर रिषभ पंत ९० धावांवर खेळत आहे, तर केएल राहुल १०१ धावांवर नाबाद आहे. भारताचे ३ बाद २४३ धावा झाल्या आहेत. जर रिषभने शतक केले, तर हे त्याचे या सामन्यातील दुसरे शतक असेल. त्याने पहिल्या डावातही शतक केले होते.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात ४६५ धावा केल्या होत्या.