पुणे : गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळा-मुठा नदीपात्रात विसर्ग करावा लागला आहे. परंतु नदीची वहन क्षमता कमी झाल्याने पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे, असा दावा पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर, विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात पुणे शहर व घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीला पूर आला होता. यामध्ये नदीकाठचा निवासी भाग पाण्याखाली गेल्याने १३०० पेक्षा जास्त नागरिकांना महापालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते.
त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एकतानगरीमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. जलसंपदा विभागाने २०११ मध्ये मुळा-मुठा नदीची पूररेषा ही एक लाख १८ हजार क्युसेकला इशारा पातळी निश्चित केली आहे. नदीमध्ये एवढे पाणी आल्यानंतर बंडगार्डन येथील बंधाऱ्याजवळ ५४२.४५ मीटर ही पूररेषा असते. ही पूररेषा न ओलांडता एक लाख १८ हजार क्युसेक पाणी वाहून गेले पाहिजे.
मात्र मुळा-मुठा नदीपात्रातीलगाळ, अतिक्रमणे, नदीत भराव टाकणे, नदीपात्रात अडथळे निर्माण करणे यामुळे नदीची वहन क्षमता गेल्या १४ वर्षांत ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. २५ जुलै २०२४ मध्ये बंडगार्डन येथे ६९ हजार १११ क्युसेक पाणी असताना तेथील पाण्याची पातळी ही ५४२.६० मीटर इतकी होती.
Pune News: बदल्यांमुळे प्राध्यापकांचा उत्सव पगाराविना; पुणे जिल्ह्यासह राज्यातील स्थिती, सुमारे १६० जणांचे पगार रखडलेयावर्षी २० ऑगस्टला सायंकाळी ७१ हजार ४०८ क्युसेक पाणी बंडगार्डन येथे होते, तर पुराची पातळी ५४२.७० मीटर इतकी होती. याचा अर्थ जलसंपदा विभागाने एक लाख १८ हजार क्युसेक पाण्याला ५४२.४५ मीटर इतकी पूरपातळी निश्चित केली असताना त्यापेक्षा कमीपाणीअसताना ही पूरपातळी गाठली जात आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यादवडकर, वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.