ज्योतिषशास्त्रानुसार, अत्तर लावणं हे शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे अनेक जण अत्तर किंवा परफ्यूम लावताना दिसतात. कारण त्याचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे. हा ग्रह सौंदर्य, संपत्ती, प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे हा ग्रह मजबूत झाला तर त्याची तशी फळं मिळतात अशी धारणा आहे.
अत्तर किंवा परफ्यूमच्या सुगंधाने लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात आकर्षणासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच शुक्र प्रेमाचा कारक असल्याने त्याचा लाभ देखील मिळतो.
शुक्रवारी अत्तर लावणं हे शुभ मानलं जातं. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात सुगंधी द्रव्य दान केल्याने त्याचा लाभ मिळतो, अशी धारणा आहे. यामुळे शुक्र ग्रहाला बळकटी मिळते. त्यामुळे दुहेरी लाभ मिळतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
मनगटावर अत्तर लावणं सर्वात प्रभावी मानलं गेलं आहे. कारण हा नाडी बिंदू आहे. यामुळे रक्ताभिसरण जलद होते तसेच शरीरभर सुगंध पसरतो असं मानलं जातं. शुक्राची ऊर्जा वाढवण्यासाठी हा प्रभावी उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो. यामुळे आत्मविश्वासही वाढतो.
कानाच्या खालच्या बाजूला अत्तर लावणं देखील शुभ मानलं जातं. हा भाग मज्जातंतु केंद्राशी जोडलेला असतो. या ठिकाणी अत्तर किंवा परफ्यूम लावल्याने सुगंध बराच काळ टिकतो. सुगंधामुळे शुक्र बलवान होतो आणि नातेसंबंध आणखी गोड होतात.
हृदयाजवळ अत्तर लावणं देखील शुभ मानलं गेलं आहे. यामुळे शुक्र ग्रह भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर मजबूत होतो. यामुळे प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होतो. एकंदरीत काय तर शुक्र आणि अत्तराचा थेट संबंध आहे. त्यामुळे अत्तर लावणं चांगलं ठरतं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)